शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
3
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
4
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
5
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
6
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
7
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
8
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
9
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
10
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
11
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
12
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
13
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
14
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
15
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
16
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
17
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
18
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
19
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
20
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....

ग्रामीण भागाचे अर्थचक्र थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

: इतर व्यवसायही लॉकडाऊन घनश्याम नवघडे नागभीड : मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील ...

: इतर व्यवसायही लॉकडाऊन

घनश्याम नवघडे

नागभीड : मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि तालुक्यातील अर्थचक्राला गती मिळाली. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूमध्ये हे मिरची सातरे रडारवर आल्याने बंद करण्यात आले आहेत. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात मिरची सातऱ्यांच्या रूपाने सुरू असलेले अर्थचक्र थांबले आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. धान या एका पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीत तर नागभीड तालुका कोसोदूर आहे. उद्योगविरहीत तालुका अशीच नागभीड तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना शेतीची कामे संपली की, बेकारीचेच जीवन जगावे लागते. म्हणूनच तालुक्यातील हजारो मजूर कामाच्या शोधात जिल्ह्यात आणि दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील किमान ४० ते ५० गावात सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले होते.

हे मिरची सातरे पाहून अनेकांना समज होत होता की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समज पूर्णत: चुकीचा होता. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून ट्रकांद्वारे आणली जात होती. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जात होत्या. त्यासाठी एका बोरीवर मजुरांना ठराविक मोबदला दिला जात होता. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करीत होती. आता हे सातरे गावातच असल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले होते. मिरची स्वच्छ झाली की, देशविदेशात निर्यात होत होती.

बॉक्स

रोजगार हमीची कामेही बंद

शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबूल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येते.

नागभीड तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही.

बॉक्स

जिथे मजूर तिथे सातरा

या मिरची सातऱ्यांचे एकंदर अवलोकन केले तर ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होतात, त्या ठिकाणी हे मिरची सातरे सुरू करण्यात येतात. एका सातऱ्यावर किमान २०० ते ३०० मजूर काम करतात. काही गावात तर मजुरांची उपलब्धता लक्षात घेऊन दोन सातरे सुरू करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात किमान ५० गावात मिरची सातरे असावेत. याचा अर्थ किमान १० हजार मजुरांची रोजी रोटी या मिरची सातऱ्यांवर अवलंबून होती. मात्र, लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूने या रोजीरोटीवरच गदा आली आहे.

बॉक्स

ग्रामपंचायतीकडे नोंद

या मिरची सातऱ्यांची नोंद तहसील कार्यालयाकडे करण्यात येत नाही. ती ग्रामपंचायतींकडे असते, अशी माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यामुळे तालुक्यात नेमके किती सातरे आहेत, हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.