शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नदी, नाले कोरडे; पाण्यासाठी गावागावात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:00 IST

जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने बेजार स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुका आणि परिसर सुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची धावपळ : पाण्याचा प्रश्न होतोय बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने बेजार स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा तालुका आणि परिसर सुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे.यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. वर्धा नदीचे पात्र सध्या एक मोठे वाळवंट बनले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वर्धा नदीचे पात्र, नद्या, नाले, तलाव, विहिरी शेवटच्या घटका मोजत आहेत. नद्या, नाले यावर बॅरेज बांधकाम झालेले नाहीत. अनेक बंधारे, मोडकळीस आलेले आहेत. बांध नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे राजुरा शहरालाही पाणीसाठी झगडावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असून प्रशासन मात्र हतबल झाले आहे.माध्यमातून समस्या मांडली तर प्रशासन काही तुरळक उपाय करते. मात्र टॅकरच्या साह्याने पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्नही तोकडे पडत आहेत. परिणामी पाण्यासाठी नागरिकांना चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील पाचगाव, सोनुर्ली, लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.) खिर्डी, वडगाव, चनई, मांगलहिरा, कोरपना, गडचांदूर, हरदोना, वनसडी, पिपर्डा, कोडसी, सास्ती, धोपटाळा, रामपूर, साखरी, मात्रा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भूरी येसापूर, अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावांमध्ये नागरिक पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डे खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे असतात. पाणी साचले की मध्यरात्री उठून पाणी भरतात. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन मात्र अनेक ठिकाणी हातावर हात धरून बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर काही भागात प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र तेही अपुरे पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. असेच राहिल्यास पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या आराखड्यात विहीरीचे खोलीकरण, इनवेल बोअर मारणे, खाजगी विहीरी अधिग्रहण करणे, नवीन विहिरी, कूपनलिका लावणे, तात्पुरत्या पुरक योजना निर्माण करणे असे निश्चित केले. मात्र एकही उपाययोजना झालेल्या नाही.प्रभावी उपाय हवेजिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून जागतिक तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. जमीनीतील ओलावा केव्हाच नष्ट झाला असून जंगले, माळरान ओसाड पडत आहेत. यासोबतच मामा तलावातही अत्यल्प पाणी शिल्लक आहे. यामुळे गावखेड्यात पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. मान्सून वेळेवर न आल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.