शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

By admin | Published: January 04, 2017 12:55 AM

प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.

संजय वैद्य : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून त्यात घरकूल मंजुरीसाठी चार टप्पे करण्यात आले आहेत. या योजनेत विशेषत: कच्च्या घराचा पक्क्या घरात बदल करण्यापासून तर कुठेही, कोणतेही स्वत:चे घर नसलेल्या भाडेकरू नागरिकांना स्वमालकीचे घर देण्यापर्यंत समावेश आहे. याशिवाय दोन लाख रुपयांच्या अनुदानापासून ते बँकेमार्फत कर्ज रूपाने ६.३० टक्के व्याज दराने देण्यात येणाऱ्या ६ लाख रुपयांपर्यंतच्या निधीचाही योजनेत समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी मनपा करीत असून घरकुलासाठी मागणी अर्ज करण्यास नागरिकांची झुंबड उडत आहे. पण योजनेतील काही अटींमुळे महानगरातील ७० टक्के नागरिक या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वैद्य यांनी वर्तविली आहे. योजनेतील घटक क्रमांक १ व ३ मध्ये जागा मालकीची, कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. पण, घटक क्रमांक १ साठी मनपा हद्दीतील घोषित झोपडपट्टी भागात कच्चे घर असणे आवश्यक आहे. घटक क्रमांक ३ मध्ये घरकूल बांधण्यासाठी बँकेद्वारे कर्जपुरवठा केला जाणार आहे. शहरातील ६० ते ७० टक्के रहिवासी वस्ती नझूल जागेवर आहे. अद्याप त्यांना कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत. शिवाय खासगी मालकीच्या लेआऊटमध्ये ज्या नागरिकांची घरे आहेत. त्यामध्ये रहेमतनगर, सिस्टर कॉलनी, स्वावलंबीनगर, पठाणपुरा गेट वस्तीचा समावेश आहे. पण, हा भाग पूरग्रस्त क्षेत्रात असल्यामुळे नगररचना विभागाच्या नियमानुसार ही जागा बांधकाम मंजुरीसाठी अधिकृत ठरणार नाही. यासोबतच बंगाली कॅम्प ते बल्लारपूर वळणमार्गापर्यंतच्या परिसरातील खासगी लेआऊटमधील वस्ती ही वेकोलिच्या कोल बेल्ट क्षेत्रात येत असल्यामुळे हा परिसरसुद्धा बांधकाम मंजुरीसाठी अनधिकृत ठरणार असल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे. भाडेकरूंसाठी असलेल्या घटकात शहरात किंवा शहराबाहेर घरकुलाचे बांधकाम करण्यास स्वस्त दराची खासगी किंवा शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या घटकातील नागरिकही योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर योजना मुंबई, पुणे यासारख्या महानगरासारखी लागू केली आहे. ते निकष चंद्रपूर महानगरात लागू होत नाही. चंद्रपुरात घरकुलांची अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरकुलाची मागणी व निकष लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी करावी. सदर अटींचा ताळमेळ बसवावा यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे नगरसेवक संजय वैद्य यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)