शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:38 IST

सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला. मृदा व जलसंधारण विभाग, चंद्र्रपूर व मृदा व जलसंधारण संस्था वाल्मी औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने रेंजर कॉलेज येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामांचे हस्तांतरण व लोकसहभागाने जलसंधारणाच्या कामाची देखभाल तसेच दुरुस्ती या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेश बावनगडे, वन प्रशिक्षण अकादमीच्या उपसंचालिका मनीषा भिंगे, मृदा व जलसंधारण संस्थेतील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक बोकाडे, कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी, जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. पिपरे उपस्थित होते. जलसंधारणाच्या तांत्रिक बाबी या विषयावर सोळंकी व डॉ. राजेंद्र्र पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. पाण्याची खालावलेली पातळी दूर करण्यासाठी पुनर्भरणाच्या कामाची गरज मांडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावाच्या पाण्याचा ताळेबंद तयार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याचे जलसंधारण करावे, यावर चर्चा झाली. सुयोग्य पीक नियोजन व पाणी व्यवस्थापन या विषयावर किशोर राठोड यांनी मार्गदर्शन केले भूमिका बजावणारे पुरुषोतम मत्ते व ईश्वर ठेगणे यांचा सत्कार करण्यात आला.