शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:38 IST

सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला. मृदा व जलसंधारण विभाग, चंद्र्रपूर व मृदा व जलसंधारण संस्था वाल्मी औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने रेंजर कॉलेज येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामांचे हस्तांतरण व लोकसहभागाने जलसंधारणाच्या कामाची देखभाल तसेच दुरुस्ती या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेश बावनगडे, वन प्रशिक्षण अकादमीच्या उपसंचालिका मनीषा भिंगे, मृदा व जलसंधारण संस्थेतील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक बोकाडे, कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी, जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. पिपरे उपस्थित होते. जलसंधारणाच्या तांत्रिक बाबी या विषयावर सोळंकी व डॉ. राजेंद्र्र पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. पाण्याची खालावलेली पातळी दूर करण्यासाठी पुनर्भरणाच्या कामाची गरज मांडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावाच्या पाण्याचा ताळेबंद तयार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याचे जलसंधारण करावे, यावर चर्चा झाली. सुयोग्य पीक नियोजन व पाणी व्यवस्थापन या विषयावर किशोर राठोड यांनी मार्गदर्शन केले भूमिका बजावणारे पुरुषोतम मत्ते व ईश्वर ठेगणे यांचा सत्कार करण्यात आला.