शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:38 IST

सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला. मृदा व जलसंधारण विभाग, चंद्र्रपूर व मृदा व जलसंधारण संस्था वाल्मी औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने रेंजर कॉलेज येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामांचे हस्तांतरण व लोकसहभागाने जलसंधारणाच्या कामाची देखभाल तसेच दुरुस्ती या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेश बावनगडे, वन प्रशिक्षण अकादमीच्या उपसंचालिका मनीषा भिंगे, मृदा व जलसंधारण संस्थेतील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक बोकाडे, कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी, जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. पिपरे उपस्थित होते. जलसंधारणाच्या तांत्रिक बाबी या विषयावर सोळंकी व डॉ. राजेंद्र्र पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. पाण्याची खालावलेली पातळी दूर करण्यासाठी पुनर्भरणाच्या कामाची गरज मांडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावाच्या पाण्याचा ताळेबंद तयार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याचे जलसंधारण करावे, यावर चर्चा झाली. सुयोग्य पीक नियोजन व पाणी व्यवस्थापन या विषयावर किशोर राठोड यांनी मार्गदर्शन केले भूमिका बजावणारे पुरुषोतम मत्ते व ईश्वर ठेगणे यांचा सत्कार करण्यात आला.