शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

१० हजार ८०० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटणार इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:27 AM

कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ...

कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. परंतु, संचारबंदीमुळे रिक्षाचालकांना ग्राहक मिळणार नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या निर्माण होतील, यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना दीडहजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. या मदतीमुळे रिक्षाचालकांना थोडा दिलासा मिळतो. पण, हातावर पोट असणाऱ्या इतर असंघटितांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपुरात केवळ ३ हजार ६०० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. शेकडो रिक्षाचालक इतरांची रिक्षा भाड्याने चालवितात. त्यांना या मदतीचा लाभ मिळणार नाही.

कोट

संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, दीडहजाराची रक्कम अतिशय अल्प आहे. कोरोनामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडाला. गतवर्षीपासून त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. अशा स्थितीत दीडहजार रुपये किती दिवस पुरणार? या रक्कमेत वाढ करण्याची गरज आहे.

-राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना, चंद्रपूर

सरकारने दीडहजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही रक्कम तातडीने दिली पाहिजे. व्यवसाय चालत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा काळात मदत देण्याचा निर्णय चांगला आहे.

-प्रशांत गेडाम, रिक्षाचालक, बाबूपेठ चंद्रपूर

केवळ परवानाधारकांनाच मदत मिळणार आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक मदतीपासून वंचित राहतील. ज्यांनी परवाना मिळविण्यासाठी कागदपत्रे सादर केली. त्यांनाही ओसीच्या आधारे दीडहजाराची मदत दिली पाहिजे.

-सुधाकर रिंंगणे, रिक्षाचालक तुकूम चंद्रपूर