शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चंद्रपूर जिल्ह्यातील धानपट्ट्यात ‘पोटोंडी’ पद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही ...

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून बघण्याची ‘पोटोंडी’ ही पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्या ही पद्धत बंद झाल्यासारखीच स्थिती आहे.

सद्य:स्थितीत धानपट्ट्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम जोरात सुरू आहे; पण सद्य:स्थितीत शेतकरी पोटोंडी पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रांवरून बियाणे घेतले की, सरळ शेतावर नेत असून लगेच आवते आणि पऱ्ह्याची भरणी करीत आहेत.

पोटोंडी टाकण्याची एक पद्धत होती. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पऱ्ह्याच्या जागेची अगोदर मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की, घरीच साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोंडी या पद्धतीचा उपयोग व्हायचा. यासाठी साठवून ठेवलेल्या बियाणांमधून ओंजळभर धान्य काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये टाकले जायचे. नंतर हा बोळा पानांपासून बनविलेल्या द्रोणात ठेवला जायचा. आवश्यकतेनुसार या बोळ्यात पाणी देण्यात येत होते. चार-पाच दिवसांत या धान्यांना अंकुर आले नाही तर या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात यायचे आणि लगेच हे शेतकरी दुसऱ्या बियाण्यांची तजवीज करायचे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर टळायचे. त्याचबरोबर नंतर उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचा वापर करून वेळेवर हंगामही करता यायचा.

पण आता काळ बदलला आहे आणि काळाबरोबर काळाच्या व्याख्याही बललल्या आहेत. शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत जवळपास बंद झाली आहे. त्याऐवजी कृषी केंद्रांमधून तयार बियाणे घेऊन त्यांचेच आवते व पऱ्हे टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होत असते. कृषी केंद्रांमधून खरेदी केलेले बियाणे काहीवेळा उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येत असल्या तरी शेतकऱ्यांनी पोटोंडीकडे पाठ फिरवली हेही तेवढेच खरे आहे.

कोट

पूर्वी आम्ही पोटोंडी या पद्धतीचा उपयोग करीत होतो. त्यामुळे बियाण्यात उगवण क्षमता आहे की नाही हे लक्षात यायचे; पण आता या पद्धतीचा शेतकरी वापर करताना दिसत नाही.

- बाळाजी सातपैसे, शेतकरी नवखळा.