शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलीसपुत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:16 IST

मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : पोलीस बॉईज संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशसेवेसाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्यसरकारचे आणि गृहमंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस पुत्रांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चाची सुरुवात हनुमान मंदिर बेलेवाडी येथून करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हाधिकारी यांना पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले.मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. हे पोलीस कर्मचाºयांसाठी घातक असून, राज्यातील पोलीस कर्मचारी विविध समस्यांचा सामना करीत आहे. मात्र, शिस्तीच्या नावाखाली पोलीस कर्मचाºयांना मोर्चे, आंदोलन करता येत नसल्याने त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या मुलांनी एकत्र येण्याचे ठरवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा निर्धार केला. मंगळवारी मोर्चाद्वारे पोलीस कर्मचाºयांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.यावेळी विधानपरिषदेत पोलीस बॉइज असोसिएशनचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा, होमगार्डसना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी, पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात यावी, पोलीस कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोलीस भरतीत पोलीस बॉइजना दहा टक्के आरक्षण द्यावे आदी मागण्यांचे निवेदन पोलीस बॉइज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शाहिद सैय्यद, भुवनेश्वर निमगडे, देविदास गिरडे, तोजीतचंद्र पिपरे, अमित वाघमारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस