शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अभ्यासिकांमुळे वाढला स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.

ठळक मुद्देमुनगंटीवार यांची दूरदृष्टी : पोंभुर्णा, मूल, बल्लारपुरातही अभ्यासाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारच्या पायाभूत संस्थांची गरज असते. हाच दूरदृष्टीकोन पुढे ठेवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभ्यासिकांपासून अनेक ज्ञानात्मक संस्था सुरू केल्या. परिणामी, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या संस्थांमधील ज्ञानात्मक उपक्रमांचा लाभ घेऊन कौशल्यवृद्धी करीत आहेत. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांच्या कालावधीत स्पर्धा परीक्षेतही जिल्ह्याचा टक्का वाढत आहे.जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अभ्यासिक उभारण्याची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात दखलपात्र ठरली. गोंडवाना विद्यापीठात स्व. बाबा आमटे अध्यासन स्थापण्याचा निर्णय घेतला.वेकोलिच्या सीएसआर निधीतून २२ जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ५५३ विद्यार्थिंनींना सायकलींचे वितरण केले. विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढावा, स्पर्धेत अव्वल राहावे, याकरिता शैक्षणिक उपक्रमांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला.अभ्यासासाठी समृद्ध ग्रंथसंपदामिशन सेवाच्या माध्यमातून एमपीएससी, युपीएससी व तत्सम स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी विशेष उपक्रम सुरू केले. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले सैनिकी स्कूल भारतात अव्वल ठरले आहे. बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा येथे अभ्यासिका तयार करून समृद्ध ग्रंथसंपदा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले. युवक- युवती आता स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.तीन तालुक्यात सुसज्ज वसतिगृहेमूल येथे आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहांचे बांधकाम करण्यात आले. मूल शहरात माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारून निवासाची व्यवस्था केली. मूल शहरात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी मूल-मूलींसाठी शासकीय वसतिगृहाचे बांधकाम मंजूर झाले आहे. पोंभूर्णा येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी वसतिगृहाचे बांधकाम मंजूर केले.३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणपाचवी ते दहावी पर्यंतच्या ९४२ जिल्हा परिषद शाळांमधील ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना टाटा ट्रस्टमार्फत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. मिशन सेवा माध्यमातून जिल्ह्यातील २०० सार्वजनिक गं्रथालयांन १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक पुस्तके दिली. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळा घेतल्या.

टॅग्स :libraryवाचनालय