शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अभ्यासिकांमुळे वाढला स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.

ठळक मुद्देमुनगंटीवार यांची दूरदृष्टी : पोंभुर्णा, मूल, बल्लारपुरातही अभ्यासाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारच्या पायाभूत संस्थांची गरज असते. हाच दूरदृष्टीकोन पुढे ठेवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभ्यासिकांपासून अनेक ज्ञानात्मक संस्था सुरू केल्या. परिणामी, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या संस्थांमधील ज्ञानात्मक उपक्रमांचा लाभ घेऊन कौशल्यवृद्धी करीत आहेत. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांच्या कालावधीत स्पर्धा परीक्षेतही जिल्ह्याचा टक्का वाढत आहे.जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अभ्यासिक उभारण्याची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात दखलपात्र ठरली. गोंडवाना विद्यापीठात स्व. बाबा आमटे अध्यासन स्थापण्याचा निर्णय घेतला.वेकोलिच्या सीएसआर निधीतून २२ जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ५५३ विद्यार्थिंनींना सायकलींचे वितरण केले. विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढावा, स्पर्धेत अव्वल राहावे, याकरिता शैक्षणिक उपक्रमांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला.अभ्यासासाठी समृद्ध ग्रंथसंपदामिशन सेवाच्या माध्यमातून एमपीएससी, युपीएससी व तत्सम स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी विशेष उपक्रम सुरू केले. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले सैनिकी स्कूल भारतात अव्वल ठरले आहे. बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा येथे अभ्यासिका तयार करून समृद्ध ग्रंथसंपदा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले. युवक- युवती आता स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.तीन तालुक्यात सुसज्ज वसतिगृहेमूल येथे आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहांचे बांधकाम करण्यात आले. मूल शहरात माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारून निवासाची व्यवस्था केली. मूल शहरात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी मूल-मूलींसाठी शासकीय वसतिगृहाचे बांधकाम मंजूर झाले आहे. पोंभूर्णा येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी वसतिगृहाचे बांधकाम मंजूर केले.३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणपाचवी ते दहावी पर्यंतच्या ९४२ जिल्हा परिषद शाळांमधील ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना टाटा ट्रस्टमार्फत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. मिशन सेवा माध्यमातून जिल्ह्यातील २०० सार्वजनिक गं्रथालयांन १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक पुस्तके दिली. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळा घेतल्या.

टॅग्स :libraryवाचनालय