राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ...
जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प् ...
संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जि ...
शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकम ...
येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे. ...
दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना राबविताना वार्षिक आराखड्यानुसार निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागाने निधीच्या स्वरूपातही बदल केला. यासंदर्भात ...
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला त्वरीत आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कमल स्पोेर्टींग क्लबने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत. ...
वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात १५ रूग्णांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी चिकणी गावानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. ...
दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते. ...