शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

By admin | Updated: November 29, 2015 02:01 IST

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर ....

चंद्रपूर : केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ ‘खासदार चषक २०१५’ ६५ किलो वजन गट विदर्भस्तरीय (पुरूष) तीन दिवसीय भव्य कबड्डी सामन्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सामन्याचे विधीवत उद्घाटन दीप प्रज्वलनाने मान्यवर अतिथींच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना शामकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव अंदनकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, उपमहापौर वसंत देशमुख, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, वासुदेवराव कोतपल्लीवार, भाजपा मनपा गटनेते अनिल फुलजेले, झोन सभापती अंजली घोटेकर, अनिल शिंदे, चंद्रपूर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक मोरे, सचिव दिलीप रामेडवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक रामू तिवारी, धनंजय हूड, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, राजू खांडेकर, रघूवीर अहीर, वनश्री गेडाम, विलास जागेकर आदी प्रभृतींची उपस्थिती होती.प्रारंभी स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. नाना शामकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या क्रीडा विषयक भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी अगदी सुरूवातीपासूनच विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे असे सांगत आजही राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना क्रीडा वाढीला प्रोतसाहन देत विविध प्रकारच्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी सदोदित चालविला आहे. आयोजकांनीमंडळांनी अतिशय परिश्रमातून हे आयोजन करून विदर्भस्तरीय कबड्डी सामने आयोजित करून शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा पटूंना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना यशाच्या शुभेच्छा दिल्या.महापौर राखी कंचर्लावार यांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून अशा सामन्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतो व या संधीचे सोने करून अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारतात असे सांगितले. या खेळाडूंमधूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डी स्पर्धक निपजतील अशा शुभेच्छा देऊन जानेवारी २०१६ मध्ये खासदार चषकच्या धर्तीवर महापौर चषक कबड्डी सामने आयोजित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रमोद कडू, राजेश मून यांची समयोचित भाषणे झाली.उद्घाटनपर कार्यक्रमात एकूण आठ सामने घेण्यात आले. यात सन्मित्र क्रीडा मंडळ चंद्रपूर विरूद्ध इंदिरा क्रीडा मंडळ बल्लारपूर यांच्यात अटीतटीचा सामना होवून सन्मित्र क्रीडा मंडळाने बाजी मारली तर जयश्रीराम क्रीडा आखाडा बल्लारपूर व पुलगाव क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात बल्लारपूरची चमू विजयी घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद काळे, संचालन मोरे यांनी तर आभार मनोज पुलगमकर यांनी मानले. या कबड्डी सामन्यामध्ये नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील विविध मंडळाचे खेळाडू सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धनंजय हुड, विनोद शेरकी, अमित लडके, रवींद्र शेरकी, किशोर कुडे, मनोज शेरकी, भाजर रोहणे, सचिन ठाकरे, प्रमोद डाखोरे, महेंद्र व्याहाडकर, संभा खेवले, संतोष दंडेवार, प्रमोद डंभारे, समिर चाफले, श्याम चाफले व मंडळाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)