शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीनंतर मंदिर पुन्हा एप्रिल महिन्यांपासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊनच ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीनंतर मंदिर पुन्हा एप्रिल महिन्यांपासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे. आता कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरेही खुली करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे मागीलवर्षी लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर मंदिरासह सर्व बंद होते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर सर्व व्यवहारांसह मंदिरेही सुरु करण्यात आली. दरम्यान, पुन्हा यावर्षीही कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. यावेळीही मंदिरे बंद करण्यात आली. आता सर्व व्यवहार सुरु झाले आहे. मात्र मंदिरे सुरु करण्यासंदर्भात शासनाने अद्यापही निर्णय घेतला नाही. परिणामी भक्तांना घरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. तर मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे तसेच पुजारी यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास येथील महाकाली मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, विठ्ठल मंदिर, एकविरा देवी मंदिरासह अनेक मंदिर आहे. मात्र कोरोनामुळे या सर्व मंदिरांमध्ये भाविकांना येण्यावर निर्बंध आहे.

येथील महाकाली देवी मंदिरात तर सर्व दिवस भाविकांची गर्दी असते. त्यातच चैत्र महिन्यात तसेच नवरात्रामध्ये अधिक गर्दी होते. यात्रेदरम्यान, विदर्भ, मराठवाडा तसेच अन्य राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे शेकडो व्यावसायिक यावर अवलंबून असतात. मागील वर्षी तसेच यावर्षी सुद्धा यात्रा भरली नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. तर भाविकांनाही दर्शन घेता येत नसल्यामुळे आता भाविकही दर्शनासाठी आतूरले आहे. त्यामुळे शासनाने मंदिरांवरील निर्बंध हटवून मंदिरे सुरु करावीत, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

आर्थिक गणित कोलमडले

मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ पूर्णत: थांबली आहे. भाविक येत नसल्यामुळे व्यवसायही बंद आहे. जिल्हा प्रशासनाने सध्या निर्बंध उठविले आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे कोणीच येत नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णत: कोलमडले आहे. त्यामुळे डोक्यावरील कर्ज, घरसंसार कसा चालवायचा असा प्रश्न आहे.

-नरेंद्र आवटे

चंद्रपूर

कोट

मंदिरासमोर पूजेचे साहित्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र मागील वर्षी तसेच यावर्षी मंदिर बंद आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी यायचे यातून बऱ्यापैकी कमाई होत होती.

वासुदेव कुंटे, चंद्रपूर

--

कोरोना संकटामुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रत्येकाचेच नुकसान झाले आहे. मंदिर सुरु करण्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा. आता नागरिकांनाही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मंदिरात गर्दी होणार नाही. मात्र एकूणच सर्व व्यवहार सुरु होतील. लग्न, पूजापाठ, वास्तुशांती आदी सर्व बंद असल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे.

-रामप्रसाद मसादे महाराज

पुजारी, साईबाबा मंदिर, चंद्रपूर

----

किती दिवस कळसाचेच दर्शन ?

मंदिर बंद असल्यामुळे देवाचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नियमित मंदिरात जाऊन दर्शन घेणे आता पूर्णत: बंद झाले आहे. शासनाने मंदिर प्रशासनाला नियम लादून मंदिर सुरु करण्यासंदर्भात आदेश द्यावे. आता तर सर्व व्यवहार सुरु झाले आहे. त्यामुळे मंदिरही सुरु करावे.

- सतीश चहारे, चंद्रपूर

बाॅक्स

बाजारपेठ सुरु झाली आहे. सर्व व्यवहारही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवून काहीही उपयोग नाही. नागरिकांना कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे ते नियम पाळूनच मंदिरात दर्शनासाठी जातील. मात्र मंदिर बंद ठेवून त्यांची उत्कंठा वाढविणे चुकीचे वाटते.

-गोलू खाडे, चंद्रपूर