शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणीच्या प्रारंभामुळे शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला.

ठळक मुद्देकामे अंतिम टप्प्यात : गावागावात बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यातच कोरोनाचे संकटही डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकरी यावर्षी विविध दुष्टचक्रात सापडला आहे. सर्व संकटाकडे दुर्लक्ष करून शेतकरी पुन्हा शेतीमशागतीला लागला असून रविवारपासून रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाल्यामुळे आता तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे.यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी शेती कामे सुरू केली आहे. सध्या अंतीम टप्प्यातील कामात शेतकरी व्यस्त आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच पाऊस बरसण्याचे वेध लागले आहेत. रविवारी उत्तररात्री रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होईल. त्यामुळे आता राजुरा, कोरपना परिसरात काही भागात कपाशीच्या पेरणीसाठी जमिन तयार केली जात आहे. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला असून पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.चांगल्या पावसाची शक्यतायंदा मृग, आर्द्रा, पुष्प, पुनर्वसू, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा, हस्त, स्वाती या सर्वच नक्षत्रांवर पाऊस चांगल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा, मघा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाची नक्षत्रे आहेत. हजारो वर्षापासून शेतकरी पावसाच्या या बारा नक्षत्रावरुनच पीकपाण्याचा अंदाज घेतो. आजही परंपरा कायम आहे. शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात आजही या पावसाच्या नक्षत्रांना मोठे महत्त्व आहे. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने पेरणीपूर्वी तण उगवून त्यांचा नाश करणे सोईचे होते. परिणामी खरीप पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते. याशिवाय रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होते. बियाण्यांची दमदार उगवण होवून जमिनीबाहेर आलेल्या पिकाची जोरदार वाढ होते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी