शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणीच्या प्रारंभामुळे शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला.

ठळक मुद्देकामे अंतिम टप्प्यात : गावागावात बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यातच कोरोनाचे संकटही डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकरी यावर्षी विविध दुष्टचक्रात सापडला आहे. सर्व संकटाकडे दुर्लक्ष करून शेतकरी पुन्हा शेतीमशागतीला लागला असून रविवारपासून रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाल्यामुळे आता तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे.यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी शेती कामे सुरू केली आहे. सध्या अंतीम टप्प्यातील कामात शेतकरी व्यस्त आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच पाऊस बरसण्याचे वेध लागले आहेत. रविवारी उत्तररात्री रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होईल. त्यामुळे आता राजुरा, कोरपना परिसरात काही भागात कपाशीच्या पेरणीसाठी जमिन तयार केली जात आहे. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला असून पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.चांगल्या पावसाची शक्यतायंदा मृग, आर्द्रा, पुष्प, पुनर्वसू, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा, हस्त, स्वाती या सर्वच नक्षत्रांवर पाऊस चांगल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा, मघा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाची नक्षत्रे आहेत. हजारो वर्षापासून शेतकरी पावसाच्या या बारा नक्षत्रावरुनच पीकपाण्याचा अंदाज घेतो. आजही परंपरा कायम आहे. शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात आजही या पावसाच्या नक्षत्रांना मोठे महत्त्व आहे. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने पेरणीपूर्वी तण उगवून त्यांचा नाश करणे सोईचे होते. परिणामी खरीप पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते. याशिवाय रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होते. बियाण्यांची दमदार उगवण होवून जमिनीबाहेर आलेल्या पिकाची जोरदार वाढ होते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी