शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

दुसऱ्या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM

बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता.

ठळक मुद्देएरवी गजबजलेल्या खाण परिसरात स्मशान शांतता : संपामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शुक्रवारी दुसºया दिवशीही सुरू होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रूजू झाला नाही. त्यामुळे दुसºया दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले नाही. यामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाºया सास्ती, गोवरी, पोवणी, बल्लारपूर, गोवरी डीप, साखरी या ओपनकास्ट आणि बल्लारपूर ३ व ४ पिट व सास्ती या दोन भूमिगत अशा सर्व आठ खाणीतील कोळसा व माती उत्खनन पूर्णपणे बंद होते. येथील दोन खाणीत खासगी कंत्राटदारामार्फत सुरू असलेले माती उत्खननही बंद होते. कोळशाची रेल्वे व खासगी ट्रकद्वारे होणारी पूर्ण वाहतूक ठप्प होती. आजही कामगार घरूनच निघाले नसल्याने केवळ अधिकारी तेवढे कामावर होते. काम बंद झाल्याने वेकोलिचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकारच्या कोळसा उद्योगात कमर्शियल मायनिंगच्या निर्णयावर सरकारने विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे सर्वच कामगारांचे म्हणणे आहे. पाचही कामगार संघटनांनी हा विषय कामगारापर्यंत अत्यंत प्रखरपणे पोहोचविल्याने व त्याचा यथायोग्य प्रचार झाल्याने कामगार स्वयंस्फुर्तपणे या संपात सहभागी झाले, हे विशेष. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सर्व संघटनांना पत्र लिहून कामगारांच्या या अस्तित्वाच्या लढाईला आपला पाठिंबा घोषित केला आहे.कमर्शियल मायनिंगच्या माध्यमातून रोजगार मिळेल. सरकारला महसुलाद्वारे फायदा मिळेल. हा दावा पूर्णत: खोटा व दिशाभूल करणारा आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने ५२ कॅपटीव्ह माईन्स खासगी उद्योगांना देऊन हा प्रयोग केला आहे. पण त्यातील केवळ चार माईन्स सुरू झाल्या. त्यातून लोकांना रोजगार तर मिळाला नाहीच उलट तेथील कामगारांचे शोषण झाले. या कमर्शियल कोळसा खाणीमुळे काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होऊन कामगार व जनतेचे शोषण होणार आहे. या कमर्शियल मायनिंगमुळे देशाचा विकास होणार नाही.-नंदकिशोर म्हस्के, केंद्रीय अध्यक्ष,संयुक्त खदान मजदूर संघ(आयटक), नागपूर.अत्यावश्यक सेवाही बंदचशुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा विद्युत, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा यामध्ये काम करणारे कर्मचारी कामावर आले नाहीत. प्रथम, द्वितीय व तृतीय रात्र पाळीतही कामगार संघटनांचे नेते पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. कुठल्याही स्थितीत संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा इंटक, आयटक, बीएमएस, एचएमएस व सिटू या पाचही कामगार संघटनांचा निर्धार आहे.

टॅग्स :Strikeसंप