शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रदूषणाचा नीरीने सुरू केला अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:50 IST

वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवाईल्डलाईफ इंडियाचेही सहकार्य केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती शिफारस

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांवर कोळसा खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राचा होणारा परिणाम तपासण्याचे काम नागपूर येथील नीरी संस्थेच्या तज्ज्ञ पथकाने गुरुवार, २३ डिसेंबर २०२१ पासून सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या अहवालात असा अभ्यास करण्याची शिफारस केली होती.

ताडोबा प्रकल्पाजवळ कोळसा खाण सुरू करण्यासाठी वेकोलिला पर्यावरणीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाजवळच महाजेनकोनचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. हे दोन्ही प्रकल्प ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या दक्षिण सीमेवर आहेत. त्यांचा या प्रदेशातील वन्यजीवांवर होणारा परिणाम तपासण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या अहवालात केली. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी नागपुरातील नीरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली.

वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. नीरीला या अभ्यासात वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सहकार्य लाभणार आहे. ताडोबाच्या मध्यापासून सुमारे ३५ किमीच्या क्षेत्रात हा अभ्यास केला जाईल. यामध्ये, कोअर आणि बफर अशा दोन्ही जंगलांचा समावेश राहील. या अभ्यासामुळे खाण आणि जंगल व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची माहिती हाती येऊ शकते.

नीरीच्या अभ्यासाचे स्वरूप

ताडोबा प्रकल्पात जमिनीचा किती वापर होतो. त्याची मोजणी, वाघासह वन्य श्वापदांच्या अस्तित्वाचा अभ्यास,स्थानिक जनतेच्या अवलंबित्वाचे सर्वेक्षण तसेच कोळखा खाणीतून येणाऱ्या ध्वनितरंगांचा अभ्यास, हवेतील घटकांची तपासणी केली जाईल. याशिवाय या प्रकल्पामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या मानव- वन्यजीव संघर्षाचा देखील अभ्यास होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.

वन्यप्राणी अधिवासाला होणारा धोकाही तपासणार

ताडोबा बफर जंगलात पानांवर धूळ साठण्याचे प्रमाण जास्त आहे. या धुळीचा झाडांच्या प्रकाश संश्लेषणावर काय परिणाम होतो, प्राणवायू व कर्बवायूची पातळी किती, औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे का, कॉरिडॉर्सचे नुकसान होणार का, याचीही तपासणी नीरीच्या पथकाकडून केली जाणार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पwildlifeवन्यजीवpollutionप्रदूषण