शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

बरे होणाऱ्यांपेक्षा कोरोना बाधितांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या ६९९ ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार ८१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९९ हजार २७८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील २४ तासामध्ये ६३ नव्या रुग्णांची भर पडली असून केवळ २७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार ३८५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २३ हजार २८५ जण कोरोनातून बरे झाले आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तेथील प्रशासनाने सक्त पाऊल उचलले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या ६९९ ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार ८१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९९ हजार २७८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

चित्ररथांद्वारे जनजागृतीजिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी  हिरवी झेंडी दाखविली.जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित कोविड लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांच्या संकल्पनेतून या प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे. डिजिटल चित्ररथासोबत योजनांची माहिती देणारे प्रचार साहित्य देखील वितरित केले जाणार आहे.  दरम्यान, समाज कल्याण विभागाच्यावतीनेही विविध योजनांची माहितीसाठी चित्ररखाद्वारे्ा माहिती देण्यात येणार आहे.

सुरक्षित अंतर राखा- जिल्हाधिकारीकोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखा तसेच त्रिसुत्रीचा वापर  प्रत्येक नागरिकांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या