शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खून, फसवणूक, विनयभंगाची प्रकरणे अधिक

By admin | Updated: February 12, 2015 00:57 IST

बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे ...

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी आहे. राज्याची सीमा बदलणारे रेल्वे स्थानक येथेच आहे. परिणामी शहरात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, कलकत्ता व अन्य राज्यातील कामगारांनी व नागरिकांनी येथील वास्तव्याला पसंती दिली. सामाजिक सलोखा राखत असतानाच काही गुन्हेगार प्रवृत्ती डोके वर काढत आहे. विविधतेत राहणाऱ्या नागरिकांना एकसूत्रता ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. तरीही मागील वर्षी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच खून, चार खूनाचा प्रयत्न, दोन फसवणूक, १५ घरफोड्या व १२ विनयभंगाचे प्रकार घडले आहे. सामाजिक सलोख्यासाठी केला जातो प्रयत्नबल्लारशाह पोलीस ठाण्याने आजवर अनेक गंभीर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. येथे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय वडस्कर यांच्या कथित खूनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. दुहेरी खूनाचा प्रकारही घडला. खून करुन प्रेत स्मशानभूमीत पुरल्यानंतर प्रकरणाचा उलघडही झाला. तरी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. आपली समाजव्यवस्था उत्सव प्रिय असल्याने पोलीस ठाण्यांतर्गत शांतता समितीत्यांचे गठन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सभा धार्मिक सण, गणेशोत्सव, दुर्गाेत्सोव व शारदा उत्सवादरम्यान घेण्यात येवून समन्वयाची भूमिका पोलीस प्रशासनाला पार पाडावी लागते. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पोलिसांवर ताण येतो. त्यावर येथील पोलिसांनी मात करुन सामाजिक व राजकीय सलोखा जोपासण्याचा प्रयत्न या पोलीस ठाण्याने आजवर जपल्याचे दिसून येते. ५ ते ३० कि.मी. विस्तारलेले क्षेत्र बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील १९ गावांचा समावेश आहे. येथील ठाण्यापासून मोहाळी खुर्द व मानोरा गावाचे अंतर तब्बल ३० किलोमीटर असून सर्वात कमी अंतरावरील ग्रामीण बामणी (दुधोली) व विसापूर पाच किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये जुनोना, कारवा, आसेगाव, गिलबिली, इटोली, किन्ही, आमडी, कळमना, कोर्टिमक्ता, कोर्टितुकूम, लावारी, दहेली आदी गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र पाच किलोमीटरपासून ३० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून बल्लारपूरसह ग्रामीण भागावरील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा बिट तयार करण्यात आले आहेत.पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचणबल्लारपूर पोलीस ठाणे १९५६ मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी दोन अधिकारी जेमतेम ५० कर्मचारी कार्यरत होते. आजघडीला लोकसंख्या वाढली असून कार्य क्षेत्र देखील वाढले आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक पदासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच उपपोलीस निरीक्षक, ३० पोलीस हवालदार, १०७ पोलीस शिपाई असे एकूण १४४ पदे मंजुर आहेत. तरीही येथे तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांसह ३९ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे पोलिसांना कर्तव्य बजावताना पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचणीला सामोरे जावे लागत आहे. २५ वर धार्मिक स्थळांची संख्यापोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक स्थळांची संख्या २५ वर आहे. शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह १० पुतळे उभारले आहेत. मुस्लिम धर्माच्या नऊ मशिदही आहेत, अन्य धार्मिक स्थळात गोंडकालीन राजाची समाधी, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, गुरुद्वारा, चर्च, राममंदिर, दर्गा, विविध मंडळाची बौद्ध विहारे असून आजतागायत येथे अनुचित प्रकार घडला नाही. यावरुन नागरिकांची सर्वधर्मसमभाव वृत्ती पोलिसांना सहकार्य करणारी आहे.मागील वर्षात घडल्या पाच खुनाच्या घटनाबल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत २०१३ च्या तुलनेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घट झाली असली तरी मागील वर्षी पाच खूनाच्या घटना घडल्या. याप्रकरणात आरोपिना जेरबंद करण्यात आले. यासोबतच चार घटनेत खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ६४ प्रकरणात सराईत गुन्हेरागांकडून दुखापत करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या अनुषंगाने गुन्हेगार प्रवृत्तीच्या १९ जणांना तडीपार केले आहे. घरफोडीचे १५ व चोरी प्रकरणात १० गुन्हे नोंदवून आरोपिंना जेरबंद करण्यात पोलिसांनी भूमिका बजावली.