शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार ठरला ‘आंदोलन’वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:10 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरणे दिले.चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचारी सोमवारी सकाळी १० वाजता गांधी चौकात एकत्र आले. येथूून ...

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : मोर्चा, धरणे आणि हल्लाबोलखासगी सुरक्षा रक्षकांची धडकधरणे आंदोलन : वेकोलिविरोधात जोरदार नारेबाजी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरणे दिले.चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचारी सोमवारी सकाळी १० वाजता गांधी चौकात एकत्र आले. येथूून मोर्चा काढण्यात आला. जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक या मार्गाने मोर्चा निघाला. यावेळी वेकोलिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तिथे एक मंडप उभारून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कुटुंबही सहभागी झाले होते. त्यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेचे किशोर जोरगेवार मोर्चात सहभागी झाले होते.हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची पाळीवेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाºयांना वेकोलि व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले. वास्तविक हे सुरक्षा कर्मचारी मागील १५ ते २० वर्षांपासून वेकोलित कार्यरत होते आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत होते. मात्र वेकोलि व्यवस्थापनाने स्वत:ला भ्रष्टाचारातून वाचविण्यासाठी आपली निती बदलवित सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. वेकोलि क्षेत्राच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, माजरी, वणी नार्थ येथील हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले. यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्नित भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या वतीने अनेकदा वेकोलि व्यवस्थापनाला निवेदन दिले. मात्र कर्मचाºयांवरील हा अन्याय कुणीही गंभीरतेने घेतला नाही.भारिप-बहुजन महासंघाचे धरणेआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकारने भारतीय संविधानाची उद्देशिका प्रकाशित केली होती. त्यात भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत जाणीवपुर्वक बदल करण्यात आलेला आहे. त्या विरोधात भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान इतरही अनेक मागण्या लावून धरण्यात आल्या. त्यात शेतमालाला हमीभाव, १०० टक्के कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, पदोन्नतीमधील आरक्षण पुर्ववत ठेवावे, अतिक्रमण केलेल्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, खैरलांजी, जवखेडा प्रकरणांची सी.बी.आय. चौकशी करून सामाजिक न्याय द्यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष जयदिप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते, भारिपचे महासचिव धीरज बांबोळे, संघटक कपूर दुपारे, कैविशताई मेश्राम, डॉ. प्रेमलाल मेश्राम, राजू किर्तक, रमेश ठेंगरे, पी.डब्ल्यू. मेश्राम, संजय उके, विजया भगत, रामजी जुनघरे, कृष्णा पेरकावार, रमेश लिंगमपेल्लीवार, लता साव, भाऊराव दुर्योधन, सुमित मेश्राम, सुभाष ढोलणे, बंडू ढेंगरे, धीरज तेलंग, गुरुबालक मेश्राम, राजु अडकिने, सिद्धार्थ जुलमे, अशोक पेरकावार, राजू देशकर, नागेश पथाडे, भीमलाल साव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.