शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आधुनिकतेबरोबर मिळालेल्या सुखसोयी सुखकर की घातक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 6:32 PM

पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे.

ठळक मुद्देचालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघे-कंबरदुखी लागलीजवळच्या कामांसाठीही वाहनांचा वापर

चंद्रपूर : आजकाल कामाचा व्याप वाढल्याने व्यक्ति मानसिकदृष्ट्या तणावात असतात. कामाचा व्याप, नको तो ताण, मोबाईल, संगणकवर बसून काम करणं, दिवसभर एकाच स्थितीत बसून राहणं यामुळे शरीरातील दुखणं वाढतं. त्यानंतर तिथेच जेवण आणि झोप हा प्रकार आजघडीला खूप वाढला आहे. याचा परिणाम थेट आपल्या तब्येतीवर होतो. अंगदुखी, डोळ्यांची जळजळ, थकवा, पाय दुखणे, गुडघेदुखी आदि समस्या जडतात. 

आधुनिकतेबरोबर प्रत्येकाच्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले आहेत. जवळच्या दुकानात जायचे असो, की शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की सर्व जण भुर्रर जातात. परिणामी चालण्याची सवयच आता मोडत आहे. कधी चालायची वेळ आलीच, तर दम लागतो, ठेचा लागतात, असे अनेकजण दिसतात. चालण्याची सवय नसल्याने अनेकांना नको त्या वयात गुडघे तसेच कंबरदुखीची व्याधी सुद्धा लागली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन, घरी कितीही गाड्या असल्या तरीही, चालण्याची सवय ठेवणे अत्यावश्यकच आहे.

सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे जो तो स्पर्धा करीत आहे. यामध्ये पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे. चालण्याचा सराव नसल्याने थोडे जरी अंतर चालले तरी, अनेकांना दम लागत आहे. त्यामुळे प्रकृती बिघडली की काय? असे प्रत्येकांना वाटते. एखाद्यावेळी गाडी बंद पडली, तर मग मोठीच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने चालण्याची सवय ठेवावीच. यामुळे स्वत:चे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

या कारणांसाठी होतेय चालणे...

ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ - सायंकाळ

महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत

पुरुष : गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केलीच तर शतपावली

तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

हे करून बघा...

एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा. कुठेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.

...म्हणून वाढले हाडांचे आजार

प्रत्येक घरात आता दुचाकी आली आहे. काहींकडे चारचाकी वाहन आहे. बाजारात जाणे असो, की किराणा आणण्यासाठी, गाडी काढली की झटपट जाण्याची मानसिकता सध्या वाढली आहे. चालत भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अपार्टमेंटमध्येही वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस ही चालण्याची सवय मोडत आहे.

असा होतो फायदा...

रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख होते. ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकांना गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे यांचीही माहिती नसते. पायी फिरताना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते. सोबतच शारीरिक व्यायामसुद्धा होतो.

चालण्याची सवय नसल्याने...

पायांच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतीच ही क्रिया मर्यादित राहते. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक व्यायाम होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल.

- डाॅ. विनोद मुसळे

अस्थिरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिक