शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मोबाईल बालपणच नव्हे, तर दृष्टीही हिरावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM

सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता त्यांच्या सवयीचा झाला आहे.

ठळक मुद्देसतर्क राहण्याची गरज : पालकांनीही मोबाईलचा अतिवापर टाळून मुलांसोबत संवाद साधणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी : ज्येष्ठांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सगळ्यांनाच आता मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने अती वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढून विविध समस्या निर्माण होत आहेत. सर्वाधिक समस्या बालकांमध्ये दिसत असून मोबाईल बालपणच, नव्हेतर दृष्टीही हिरावत आहे. त्यामुळे आता पालकांनीच पुढाकार घेऊन आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे आहे.सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता त्यांच्या सवयीचा झाला आहे. त्यामुळे त्यांना आता डोळ्यांच्याही आजारांचा सामना करावा लागत आहे. नेत्र तज्ज्ञांकडे जाणारे बहुतांश पालक मोबाईलमुळे आपल्या मुलांची दृष्टी कमी झाल्याची तक्रार घेऊन जातात. पालकांमध्ये २५ ते ३० टक्के पालक ही समस्या घेऊन तपासणीसाठी जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनीच आता सजग राहण्याची वेळ आली असून आपला पाल्य किती वेळ अभ्यास करतो, ती वेळ टीव्ही बघतो, किती वेळ मोबाईलवर खेळतो आणि किती वेळ बाहेर खेळायला जातो. याकडे गांभीयार्ने लक्ष देण्याची गरज आहे.पालकांसोबत केलेल्या चर्चेनुसार उच्च व मध्यमवर्गीयांंच्या मुलांमध्ये दूरचे वा जवळचे दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अनेक मुलांचा चष्म्याचा नंबर वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलांमध्ये सुध्दा डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोळ्याचेच नाहीतर अन्य आजारांचेही प्रमाण वाढत आहे. मुले बाहेरचे खेळ विसरले आहे. त्यांच्यातील सुप्त गुण लोप पावत आहेत. ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. शारीरिक हालचालीच होत नसल्याने मुलांना भूक लागत नाही. पालक आमचा मुलगा जेवत नाही अशा तक्रारी घेऊन येतात.सतत मोबाईल वापरामुळे डोळे ड्राय होऊन दृष्टीवर दुष्परिणाम होतात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे समाजापासून तो आपोआपच दूर जातो. अनेकदा मुले डिप्रेशनमध्ये पण जातात. मुलांनी लोकांत रमायला पाहिजे. पालकांनी मुलांना विविध अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतवावे. मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करावे. एवढेच नाहीतर तर पालकांनीही आपल्या मोबाईल हाताळण्याच्या सवयी बदलायला हव्यात. घरात सारखे मोबाईलवर न राहता मुलांसोबत संवाद साधण्याची गरज आहे.- डॉ. श्वेता शिंदे, नेत्ररोग तज्ज्ञ, भद्रावतीमोबाईलच्या अती वापरामुळे मुलांमध्ये नेत्र विषयक अनेक व्याधी जडल्या आहेत. अनेक फायदे असले तरी मोबाईलचा अतिरेकी वापर होणार नाही याची काळजी पालकांनी घेणे महत्त्वाचे आहे..- डॉ. गजानन खामनकर, पालक, भद्रावती

टॅग्स :Mobileमोबाइल