शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप

By परिमल डोहणे | Updated: November 3, 2023 17:53 IST

दोन दिवसांचा अल्टिमेटम : थ्री फेज वीजपुरवठ्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. संतापलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढला. चक्क अधिकाऱ्यांनाच खोलीत बंद करून कुलूप ठोकले. त्यानंतर ठिय्या आंदोलन करून हुकूमशाही सरकारचा निषेध केला. यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु, आश्वासन पूर्ण न केल्यास वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांच्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूपबंद आंदोलन करण्याचा अल्टिमेटम आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला.

रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याने हिंस्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता; परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे आंदोलन केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहराध्यक्ष सूरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिलाध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमूरकर, प्रमोद मगरे, बसंत सिंग, नीलेश भालेराव, मनोहर स्वामी, फिरोज पठाण, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे, रवींद्र धोपटे, संजय घागी, गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे, सविता सुपी, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणीच्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. म. रा. वि. वि. कंपनीने जिल्ह्यात थ्री फेज वीजपुरवठ्याचे वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून चार दिवस आणि तीन दिवस रात्री आठ तास कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येत आहे; परंतु २४ तास थ्री फेज पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

महाजनकोकडून ग्रिडमार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेज वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी आपली आग्रही भूमिका आहे. दोन दिवसांत मागणी पूर्ण न केल्यास वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांच्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूपबंद आंदोलन करणार.

- प्रतिभा धानोरकर, आमदार

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीelectricityवीजMLAआमदारmahavitaranमहावितरणagitationआंदोलनchandrapur-acचंद्रपूर