शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

१७२ गावात मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM

केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीकरण केल्या जाते. ग्रामीण भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात वेंडली अंगणवाडी केंद्रातून झाली.

ठळक मुद्देजि. प. आरोग्य विभागाचा उपक्रम : वेंडली अंगणवाडी केंद्रातून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारपासून जिल्ह्यातील १७२ गावांत मिशन इंद्रधनुष लसीकरणाला सुरवात करण्यात आली. दुर्गापूर परिसरातील ऊर्जानगर वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात या मोहिमेचे उद्घाटन झाले.केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीकरण केल्या जाते. ग्रामीण भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात वेंडली अंगणवाडी केंद्रातून झाली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्त राठोड, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. जि. प. सदस्य वनिता आसुटकर यांच्या हस्ते वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात अनुभव सचिन वटे या बालकाला पोलीओ, रोटा व्हायरस, ओपीव्ही, पेंन्टा लस देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मातांना या मोहिमेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य केमा रायपुरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे उपस्थित होते. याकरिता आर्टीस्ट सुभाष सोरते, आरोग्य सहाय्यक मुरलीधर नन्नावरे, आरोग्यसेविका आर. चहांदे, अंगणवाडी सेविका सुनिता वाकडे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.लसीकरणाचे फायदेबालकांच्या निरोगी जीवनासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकापेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. सदर मोहीम डिसेंबर २०१९, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२० अशा चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. माता व पालकांनी आपल्या बालकांना मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले. 

टॅग्स :Healthआरोग्य