शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चंद्रपूरमध्ये वाढले पुरुष नसबंदीचे प्रमाण ; एनएसव्हीकडे नागरिकांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:00 IST

मुलींच्या संख्येत सुधारणा, पण अद्याप ३४ ने पिछाडी : हजार मुलांमागे जिल्ह्यात मुलीचे प्रमाण ९६६

चंद्रपूर : मुलगा म्हणजे 'वंशाचा दिवा' हा पारंपरिक समज आता आरोग्य विज्ञान व विवेकाच्या कसोटीवर टिकू शकत नाही, हे सिद्ध झाले. त्यामुळे एका मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढली. २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत कुटुंब कल्याण कार्यक्रमात किती उद्दिष्ट साध्य झाले, याबाबत जि. प. आरोग्य विभागाने या आठवड्यात माहिती जाहीर केली. महिला तांबी बसविण्यात पूढे आहेतच. पण आता एनएसव्ही (नॉन कॉलपेल व्हॅसेक्शन) ही नसबंदी करणाऱ्या पुरुषांची संख्या देखील लक्षवेधी ठरली. मात्र, जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९६६ (३४ मुली कमी) असल्याचे वास्तव मनाला अस्वस्थ करणारे आहे.

सद्यःस्थितीत राज्याने १.७ इतका एकूण जननदर साध्य केला. यापुढे जननदराची ही पातळी कायम ठेवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा विचार केल्यास कमी वयात होणारे लग्न, आवश्यक गरजा पूर्ण न होणे, अज्ञान, अंधश्रद्धा व गैरसमजुती आदी कारणांनी लोकसंख्येत वाढ होते. चंद्रपूर जिल्ह्यात सन २००१ मध्ये २० लाख ७१ हजार १०१ एवढी लोकसंख्या होती. सन २०११ मध्ये २२ लाख ४ हजार ३०७ झाली. सद्यःस्थितीत सन २०२४ मध्ये ही लोकसंख्या २२ लाख ७० हजार १९५ पर्यंत पोहोचली. केंद्र सरकारने जनगणना करण्याची घोषणा केली. ही मोहीम कधी सुरू होईल, हे स्पष्ट नाही. मात्र, प्रत्यक्षात जनगणना झाल्यानंतरच लोकसंख्येची नेमकी वाढीव आकडेवारी पुढे येऊ शकेल.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या 'टीम वर्क'ची फलश्रुतीजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विलास दुधपचारे यांच्या नेतृत्वातील आधीच्या शिबिरांची फलश्रुती दखलपात्र ठरली. आता ११ जुलै २०२५ पासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले. हे शिबिर ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

असे आहे यंदाचे घोषवाक्ययंदा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य 'आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा' असे आहे. केवळ लोकसंख्या वाढ रोखणे पुरेसे नाही; तर उपलब्ध मनुष्यबळ आरोग्य संपन्न राखणे व नव्याने जन्म घेणारे बाळ सुदृढ असणे तितकेच महत्त्वाचे. जन्म घेणाऱ्या प्रत्येक बाळाला निश्चितपणे जगण्याची हमी असेल.

बदलली पारंपरिक मानसिकता१८ वर्षांनंतर मुलीचा विवाह, उशिरा होणारे पहिले गरोदरपण, गरोदरपणातील माता व बाळाचे सुदृढ आरोग्य, रुग्णालयातच सुरक्षित प्रसूती व कुटुंब नियोजन पद्धत निवडीची संधी व सेवा मातेला गुणवत्तापूर्ण मिळाल्यास लोकसंख्या आटोक्यात येईल, असे गाइडलाइन आहेत.

लग्नाचे वय वाढल्यास काय होईल ?

  • राज्यात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९२९ आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण ९६६ एवढे आहे. लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य व शैक्षणिक दर्जा वाढल्यास लग्नाचे वय वाढेल. हे वय वाढल्याने लोकसंख्या वाढीला आळा ब्रसेल.
  • ज्यांना एक मूल आहे. अशा जननक्षम नोडप्यांनी संतती प्रतिबंधक प्राथनांचा उपयोग करावा. नेणेकरून दोन मुलांमध्ये अंतर राहील. दोन अपत्य असणाऱ्या जननक्षम नोडप्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास नोकसंख्या वाढीस आळा बसेल.
  • जिल्हा आरोग्य ६३ विभागाने २०२४-२५ यावर्षी महिलांच्या प्रसूती पश्चात कुटुंब नियोजनासाठी प्रसूती पश्चात तांबी (पीपीआययुसीडी), तांबी (आययुसीडी) कॉपर टी कार्यक्रम प्रभाविपणे राबविले. त्यामुळे पारंपरिक मानसिकतेत मोठा बदल होत आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर