शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

रखरखत्या उन्हात शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:32 AM

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.जिल्ह्याच्या तापमानात दरवर्षी प्रमाणे यंदाही उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचा भडका उडाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तप्त उन्हात बाहेर पडायची हिंमत कुणीही करीत नाही. मात्र, ऊन वारा असो की पाऊस शेतकºयांना शेतात राबल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. गतवर्षी शेतकºयांनी शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्चच अधिक वाढल्याने शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी नेहमीच होरपळ होत आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपल्याने शेतीवर अवकळा आली. मागील हंगामाच्या उत्पादनाचा टक्का घसरला. यावषीर् शेतकºयांनी शेतमाल विकल्यानंतर दर वाढल्याने त्याचा लाभ शेतकºयांना होण्याऐवजी व्यापाºयांना झाला. यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतीवर शेतकºयांचा वर्षभराचा बजेट अवलंबू असतो. पण, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतकºयांना अािर्थक संकटाचा सामना करावा लागत आहे. ४५ अंशाच्या तापमानातही शेतकºयांना शेतीची कामे करावी लागत आहे. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी दरवर्षी निराशाच येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सिंचनाची कमतरता आदी कारणांमुळे शेतकरी होरपळून निघत आहे. याचे राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नापिकीकडे दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचे नुकसान होत असल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तापमानाने उच्चांक गाठल्याने लाहीलाही होत आहे. मागील वर्षी अल्प पाऊस पडले. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढले आहे. चाºयाची तिव्र टंचाई जाणावायला लागल्याने बेहाल झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही वेळ आल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.जनावरांचे हालनदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरपना तालुक्याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती