शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपूर जनतेची कोविड लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

त्यामुळे अजूनही लोकांमध्ये लसीकरणाची भीती असल्याचे जाणवत आहे. शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८ गावे ...

त्यामुळे अजूनही लोकांमध्ये लसीकरणाची भीती असल्याचे जाणवत आहे. शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८ गावे येत असून या गावासाठी शंकरपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ज्यांचे वय ४५ वर्षांच्या वर आहे, अशा जनतेने लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु या लसीकरणाकडे शंकरपूर व परिसरातील जनतेने पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे. ३१ मार्चपासून येथील लसीकरण सुरू असून १९ एप्रिल पर्यंतच्या २० दिवसात फक्त ५६० लोकांनी लसीकरण केले आहे तर महसूल कर्मचारी ३१ आणि आरोग्य कर्मचारी ११ यांनी लसीकरण केलेले आहे. परिसरात २८ गावात हजारो लोक ४५ वर्षांच्या वर आहेत. तरीपण ते लसीकरणासाठी का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावात लसीकरण करण्यासाठी जनतेने स्वतःहून पुढाकार घ्यावा, यासाठी दररोज दवंडी दिली जात आहे. इतकेच नाही तर ही दवंडी संपूर्ण २८ गावात दिली जात आहे. परंतु लोक लसीकरणासाठी येत नाही. आशा वर्कर हे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत. परंतु त्यांनाही कोणताच प्रतिसाद मिळत नाही.

कोट

कोविड लसीकरण जनतेच्या आरोग्यासाठी आहे. हे लसीकरण केल्यास कोविड आजार होण्याची शक्यता कमीच असते. झालाच तरी त्याची तीव्रता कमी असते. या लसीकरणामुळे मृत्यू होतो, अथवा इतर आजार होतात. या अफवा असून हे लसीकरण सुरक्षित आहे. त्यामुळे जनतेने घाबरून न जाता कोविड लसीकरण करून घ्यावे.

-डॉ सुजाता शंभरकर प्रा आरोग्य केंद्र शंकरपूर.