शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर रस्त्याचे काम बंद पाडले !

By admin | Updated: March 30, 2016 01:23 IST

अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.

अंदाजपत्रकाप्रमाणे काम नाही : नागरिक उतरले रस्त्यावरसास्ती: अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर, किन्होबोडी, मारडा, कुर्ली, भोयगाव, पेल्लोरा, नवेगाव, निमणी या दुर्गम भागाचा फायदा कंत्राटदारांनी आजवर घेतल्याचे दिसून येत आहे. कधी अवैध उत्खनन करुन तर कधी, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता मनाला वाटेल त्या पद्धतीने काम करणे, असे कंत्राटदारांचे समिकरण आहे. जैतापूर भोयगाव हा परिसर तालुक्याच्या ठिकाणाहून ५० किमी अंतरावर येत असल्याने या ठिकाणापर्यंत कधीच मोठे अधिकारी येत नसल्याने कंत्राटदार तलाठ्यासोबत आर्थिक व्यवहार करुन काम करीत आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचांदूर अंतर्गत जैतापूर ते भोयगाव या २.५ किमी अंतराचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. कंत्राटदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे गावाजवळील काम केले. परंतु अर्धे काम झाल्यानंतर मनमर्जीने काम सुरु केले. यात रवाळीचा व मुरुमाचा डबल थर असताना त्यांनी एकाच थरावर डांबर टाकणे सुरु केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अभियंत्यासोबत बोलणे करुन संबंधित कंत्राटदाराचे काम बंद पाडले.गावकऱ्यांच्या चातुर्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे झाले. आधीच विकास कामाच्या बाबतीत दुर्लक्षित गाव. गावाबाहेर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम आले आणि तेही निकृष्ठ दर्जाचे. यामुळे गावकऱ्यांच्या मनात प्रशासनाबद्दल रोष दिसून येत आहे.नुकतीच याच ठिकाणाहून जागृत युवकांनी आपले सरकार या सरकारच्या आॅनलाईन संकेतस्थळावर नांदगाव- जैतापूर रस्त्याच्या कामाची तक्रार केली असता प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन पुणे येथील चौकशी समितीला जैतापुरात येऊन कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदाराला अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण करुन देण्याचे आदेश दिले. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच गावात अशाप्रकारची हिंमत कंत्राटदाराकडून करणे म्हणजे ढिसाळ प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे उदाहरण आहे, असे समजल्यास वावगे ठरणार नाही.या परिसरात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. येथील प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालत आहे. हा संपूर्ण कारभार अर्थपूर्ण सुरु असल्यामुळे कंत्राटदारसुद्धा आपल्या बुद्धीला सुचेल त्याप्रमाणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.