शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरी’कडून फ्लोराईडग्र्रस्त गावांची पाहणी

By admin | Updated: September 6, 2014 23:38 IST

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. कोरपना, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांमध्ये काही गावांत फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. कोरपना, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांमध्ये काही गावांत फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने निरीच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त गावांची पाहणी करीत पाण्याचे नमूने गोळा केले आहे. गोळा केलेल्या पाण्याची लवकरच तपासणी करण्यात येणार असून या गावांतील पाणी समस्येबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.जिल्ह्यात अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाणी आहे. सदर पाणी नागरिक पित असल्याने आजाराची समस्या गंभीर होत आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे अनेकांना हाळांचे आजार झाले आहेत. तर काहींना कमरेतून वाक आला आहे. नागरिक आपला एक-एक दिवस कंठित आहे. जिल्ह्यातील हे प्रमाणात लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने काही गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून देण्यात आले. काही गावांना दुसऱ्या गावावरून पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र अधिक खर्चाचे काम असल्याने अद्यापही अनेक गावांमधील नागरिक फ्लोराईडयुक्त पाणी पीत आपली तहान भागवित आहे. यामुळे दिवसेंदिवस आजार गंभीर रुप धारण करीत आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने निरीच्या चमूने जिल्ह्यातील वरोरा,चिमूर तसेच अनेक तालुक्यातील गावांमध्ये जावून पाणी नमूना तपासणी सुरु केली आहे. चमूमध्ये नॅशनल जिओफीजीकल रिसर्च इंस्टिट्यूट हैद्राबादचे डॉ. डी.एन. रेड्डी, निरीचे शास्त्रज्ञ डॉ. पद्माकर, डॉ. खडसे यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता तज्ज्ञ अंजली डाहुले, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रविण खंडारे, उपविभागीय अभियंता शेंडे आदी उपस्थित होते.या चमूने वरोरा तालुक्यातील राळेगाव ,महालगाव, दादापूर, सातारा, खातोडा, टेमुर्डा आदी गावांतील पाण्याचे नमूने घेतले असून तपासणीसाठी नेले आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी प्रयोगशाळेमध्ये या गावातील पाण्याची तपासणी केली असता या गावांतील पाण्यामध्ये १.५ पीपीएमपेक्षा जास्त फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले. त्यामुळे आता निरीच्या शास्त्रज्ञांनी पाण्याचे नमुने गोळा करून त्यावर अभ्यास करणार आहे. सोबतच डोंगरगाव येथील फ्लोराईडच्या खाणीचीही तपासणी केली आहे. येथीलही फ्लोराईडचे नमूने नेण्यात आले आहे. तपासणीसाठी नेण्यात आलेल्या नमून्यानंतर या गावातील पाण्याच्या समस्येसाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र जोपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना होणार नाही तोपर्यंत येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याशिवाय इलाज नाही.(नगर प्रतिनिधी)