शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

४३ अंश तापमानात आदिवासी बांधवांचा ठिय्या, तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 10:32 IST

रखरखत्या उन्हात चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’चा दिला नारा

पोंभुर्णा (चंद्रपूर) : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाच पेसा कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन, सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक या प्रमुख व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही मंगळवारी पेटून उठले. पोंभुर्ण्यातील जुन्या बसस्थानक चौकात जन आक्रोश, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करीत रखरखत्या उन्हात वाहतूक रोखून धरली. लहान चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’ हा नारा देत आंदोलनाला बळ दिले.

जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्राही आंदोलकांनी घेतला असल्याने हे आंदोलन आणखी किती चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात चिमुकली मुले व महिलांचीही मोठी उपस्थिती होती. आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगरकार यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी व बहुजन समाजाच्या सहकार्याने आदिवासी समाज बांधवांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासीबहुल गावांना ५ वी व ६ वी अनुसूची अंतर्गत तात्काळ पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा तालुक्यातील वन जमिनी व महसूल जमिनीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे, सुरजागड लोह प्रकल्पाची भरधाव वाहतूक पोंभुर्णा शहरातून बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह आणखी महत्त्वाच्या नऊ मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनापुढे ठेवल्या आहेत.

आदिवासी नेते जगन्नाथ येलके व देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मोगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंदाजे तीन हजारांहून अधिक समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनाला यांचाही पाठिंबा

या आंदोलनाला काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.

आंदोलनस्थळीच सर्वांची जेवणाची व्यवस्था

तेलंगाणा राज्यातील १०० जणांचे पारंपरिक ढेमसा व घुसाडी नृत्य आंदोलनस्थळी दिवसभर सुरू होते. याशिवाय आंदोलकांनी जेवण, नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची सोय आंदोलनस्थळीच केली होती. आंदोलकांना जेवणाची व्यवस्था म्हणून ६० क्विंटल तांदूळ जमा केले होते व आंदोलनस्थळीच स्वयंपाक करण्याची व्यवस्था केली होती.

जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. मागण्या रास्त आहे म्हणून आंदोलनाला सर्वांची साथ मिळत आहे.

- विलास मोगरकार, सरपंच, देवाडा खुर्द.

टॅग्स :agitationआंदोलनchandrapur-acचंद्रपूर