शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

४३ अंश तापमानात आदिवासी बांधवांचा ठिय्या, तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 10:32 IST

रखरखत्या उन्हात चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’चा दिला नारा

पोंभुर्णा (चंद्रपूर) : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाच पेसा कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन, सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक या प्रमुख व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही मंगळवारी पेटून उठले. पोंभुर्ण्यातील जुन्या बसस्थानक चौकात जन आक्रोश, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करीत रखरखत्या उन्हात वाहतूक रोखून धरली. लहान चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’ हा नारा देत आंदोलनाला बळ दिले.

जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्राही आंदोलकांनी घेतला असल्याने हे आंदोलन आणखी किती चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात चिमुकली मुले व महिलांचीही मोठी उपस्थिती होती. आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगरकार यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी व बहुजन समाजाच्या सहकार्याने आदिवासी समाज बांधवांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासीबहुल गावांना ५ वी व ६ वी अनुसूची अंतर्गत तात्काळ पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा तालुक्यातील वन जमिनी व महसूल जमिनीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे, सुरजागड लोह प्रकल्पाची भरधाव वाहतूक पोंभुर्णा शहरातून बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह आणखी महत्त्वाच्या नऊ मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनापुढे ठेवल्या आहेत.

आदिवासी नेते जगन्नाथ येलके व देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मोगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंदाजे तीन हजारांहून अधिक समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनाला यांचाही पाठिंबा

या आंदोलनाला काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.

आंदोलनस्थळीच सर्वांची जेवणाची व्यवस्था

तेलंगाणा राज्यातील १०० जणांचे पारंपरिक ढेमसा व घुसाडी नृत्य आंदोलनस्थळी दिवसभर सुरू होते. याशिवाय आंदोलकांनी जेवण, नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची सोय आंदोलनस्थळीच केली होती. आंदोलकांना जेवणाची व्यवस्था म्हणून ६० क्विंटल तांदूळ जमा केले होते व आंदोलनस्थळीच स्वयंपाक करण्याची व्यवस्था केली होती.

जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. मागण्या रास्त आहे म्हणून आंदोलनाला सर्वांची साथ मिळत आहे.

- विलास मोगरकार, सरपंच, देवाडा खुर्द.

टॅग्स :agitationआंदोलनchandrapur-acचंद्रपूर