शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:27 AM

मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत : राजुरा येथे शेतकरी व कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, कामगार मेळावा व कृषी प्रदर्शन राजुरा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सत्कारमूर्ती माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुमन मामुलकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, वामनराव कासावार, देवराव भांडेकर, जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके, दत्तात्रय वेगिनवार, सुधाकर कुंदोजवार, श्रीधरराव गोडे, अ‍ॅड. मुरलीधरराव धोटे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, गजाननराव गावंडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, शिवचंद काळे, उत्तम पेचे, साईनाथ बुचे, वसंत मांढरे, तारासिंग, जि. प. सदस्य मेघा नलगे, अ‍ॅड. अरुण धोटे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानावरील स्टॉल लावले होते. यावेळी प्रगत शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. त्यानंतर मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, संचालन आनंद चलाख, प्रा. लाटेलवार तर आभार डॉ. संभाजी वरकड यांनी मानले.

टॅग्स :FarmerशेतकरीNitin Rautनितीन राऊत