शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी; गहू, तांदळासह तूप, तेल महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या धोरणामुळे डिझेलच्या दरात वाढली. परिणामी, मालवाहतुकीचे दरही चढे झाल्याने यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावरच गहू, तांदळासह, तूप व तेल महाग होऊ शकते. कोरोना संकटापासून सावरणे सुरू असताना हे नवेच संकट निर्माण झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, हे अद्याप सांगता येत नाही. लवकरच दिवाळी येणार आहे. मात्र, डिझेलचे दर प्रति लिटर ९९.१३ पर्यंत पोहोचले. याचा परिणाम देशांतर्गत मालवाहतुकीवर झाला. चंद्रपुरातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार मालवाहतुकीच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली. याचा अनिष्ट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, शेंगदाणा व अन्य तेलजन्य पदार्थांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. भाजीपाला सध्या स्वस्त आहे. येत्या काही दिवसांत त्याच्याही किमती गरिबांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे हातावर आणून पानावर खाणारी आहेत. अशा कुटुंबांना या महागाईची सर्वाधिक झळ बसणार आहे. नोकरदार वर्ग हा खर्च पेलू शकेल. पण गरिबांचे काही खरे नाही, या दिशेने बाजाराची वाटचाल सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

डिझेल शंभरीपार

- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने चंद्रपूरच्या बाजारावरही परिणाम जाणवू लागला. सध्या प्रति लिटर ९९.१३ पैसे असा दर आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वाढण्याची भीती आहे.

मालवाहतूक टक्क्यांनी वाढली- पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की वाहतुकीचे दर चढे होतात. दिवाळीच्या तोंडावर व्यापारी मालाचा साठा करीत आहेत. मालवाहतुकीचे दर २१ टक्क्यांनी वाढल्याने येत्या काही दिवसांत त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवणार आहे. 

किराणा महागणार

चंद्रपूर जिल्ह्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, नागपूर तसेच पंजाबमधून धान्याची आवक होते. साखर, तेल, विविध प्रकारच्या डाळी इटारसी, बैतूल, हैदराबाद येथूनही आणल्या जातात. परराज्यातून मालवाहतूक करण्याचे दर वाढले. यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमती भडकू शकतात.

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल