शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वीरशहाचे स्मृतीस्थळ हिराई-वीरशहाच्या प्रेमाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली.

ठळक मुद्देव्हॅलेंटाईन डे स्पेशल : तरुण-तरुणींनी घ्यावा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : आज जागतिक प्रेम दिन! एकमेकांना प्रेमाच्या शुभेच्छा देण्याचा दिवस. प्रेम प्रतिक असणाऱ्या स्थळांना भेट देऊन, त्यांच्या प्रेमाची आठवण करण्याचा दिवस! चंद्रपूर येथील राजा वीरशहा यांचे स्मृति स्थळ हे राजा व त्याची राणी हिराई यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयीन तरूण व तरूणी या दिवशी तेथे जाऊन राजा तसेच राणी या दोघांच्या समाधींना गुलाबपुष्प वाहतात. या स्मृतीस्थळाला भेट देत असताना त्यांनी राजा व राणी यांच्या कर्तबगारीचीही माहिती ठेवावी! या ऐतिहासिक शासकांनी दीर्घकाळ स्मरणात राहावे असे कार्य केले आहे.बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने विधवा हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेउन त्याला गादीवर बसविले व ती राज्य कारभार बघू लागली. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला संस्कारित केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. त्यांना तिने धाडसाने उत्तर दिले. राणी स्वत: रणांगणावर उतरली. प्रजेचे हित जोपासत उत्कृष्ट बांधकाम, शिक्षण याकडे लक्ष देउन राज्याचा सर्वांगीण विकास केला. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. तरीही राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर तसेच महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न तिने खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा आणि हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविलीच.आदर्श पती व पत्नी म्हणूनही त्यांनी आपले सांसारिक जीवन फुलविले. या कर्तबगार राजा व राणीच्या प्रेम प्रतिकांना भेट देताना, आपण चांगले कर्तव्यनिष्ट नागरिक व चांगले आदर्श पती व पत्नी बनू हा संकल्प तरूण - तरूणींनी करावा. आज देशाला त्याचीच नितांत गरज आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे