शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

25 हजार क्षेत्रात धानाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते.

ठळक मुद्देनागभीड तालुक्यातील स्थिती : पाऊस पडताच शेतकरी लागले हंगामाच्या तयारीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यात धानाच्या हंगामास लवकरच प्रारंभ होणार आहे. कृषी विभागाचे यावर्षी तालुक्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे नियोजन केले आहे.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे भरण्यास प्रारंभ केला नसला तरी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पुढील आठवड्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम सुरू करतील. तत्पूर्वी पेरणीपूर्व नागरणी, आवते व पऱ्ह्यांच्या जागेची मशागत करण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.  दरम्यान पावसाच्या या दुष्टचक्रात या तालुक्यातील शेतकरी पुरता भरडून गेला आहे. पण दुसरा कामधंदा नसल्यामुळे नाइलाजास्तव शेतीचा हा न परवडणारा उद्योग येथील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच कोरोना संसर्ग आणि लॅाकडाऊन यामुळे शेतीउपयोगी साहित्य व खते यांच्या किमतीही वाढल्या आहेत.त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

असा हवा पाऊस  

नागभीड तालुक्याची पावसाची सरासरी  १,२५६ मिमी आहे. जून महिन्यात  २१३.४ , जुलै महिन्यात ४५०.९, ऑगस्ट महिन्यात ३४४.२, सप्टेंबर महिन्यात  २०८.२ आणि ऑक्टोबर महिन्यात ३९.४ मिमी पाऊस पडायला पाहिजे. एवढा  पाऊस पडला तर धान पीक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट अशी की, असा पाऊस कधी पडतच नाही. नेहमी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. कधी आवते व पऱ्हे भरल्यांतर पावसाने हात वर केले, कधी ऐन रोवणीच्या वेळेस पावसाने डोळे वटारले तर कधी धान पीक ऐन अंतिम टप्प्यात आल्यानंतर पावसाने दगा दिला आहे. दरवर्षी शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाना सामोर जात असतो. यंदा कोरोनाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे असले तरीही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे.

तुरीचे पीक धान पिकासोबतच शेतकरी बांधावर तुरीचे पीक घेत असतात. हे पीक मोठ्या प्रमाणावर नसले तरी काही प्रमाणात प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात हे पीक घेत असतात. सध्या या बांधांवरील कचरा जाळणे, बांधांवर नवीन माती घालण्याचे काम सुरू झाले आहे. मान्सूनचे आगमण झाल्यानंतर शेतकरी तुरीची लागवड करणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी