शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

पंचायत समितीवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:45 IST

तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई : महिलांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.पारडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोला गावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, ही योजना पूर्णत्वास न आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाच्या दिवसात खासगी हातपंप अधिग्रहीत करुन पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, आता पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, या मागणीसाठी महिलांनी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.यावेळी संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मोर्चात नारायण हिवकर, देवराव गेडाम, सोनू राजूरकर, शीला सोयाम, अर्चना जेऊरकर, राजू कोट्टावार, रमेश तुरणकर, सुधाकर न्याहारे, प्रवीण हंसकर, सत्यवान जेऊरकर, नीलेश जेऊरकर, प्रभावती न्याहारे, वैशाली न्याहरे, मनिषा धारतकर, अर्चना कुळमेथे, करिश्मा सोयाम, अनिता टोंगे, नंदा बोरकर, माधुरी हंसकर, शोभा तुरणकर, पुष्पा राजूरकर, साधना राजूरकर आदी सहभागी झाले होते.सावलीतील फिल्टर नळ योजना बंदसावली : जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरु असलेली फिल्टर नळ योजना पुन्हा मागील पंधरा दिवसांपासून ठप्प झाली. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. ढिसाळ कारभाराचा हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. त्यात जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून फिल्टर नळ योजना आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून फिल्टर नळ योजना ही सतत बंद पडत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. मात्र, सर्वांना पाणी पुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. फिल्टर नळ योजना केवळ सहा महिने चालते. उर्वरीत सहा तांत्रिक बिघाडाने बंद असते, पाणी पुरवठा बंद असला तरी पाणीपट्टी वसुली करण्याचे काम नगरपंचायत करीत आहे. ही नळ योजना सावलीकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशा गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष घालून फिल्टरची नळयोजना पूर्ववत सुरळीत सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चा