शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नागभीडमध्ये बगिच्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

गेल्या काही वर्षात शहराच्या भोवती अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यात समता कॉलनी, वसुंधरा नगर, लक्ष्मी नगर, पटवारी ले ...

गेल्या काही वर्षात शहराच्या भोवती अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यात समता कॉलनी, वसुंधरा नगर, लक्ष्मी नगर, पटवारी ले - आऊट, सम्राट अशोक नगर, प्रगती नगर, विद्या नगर, आदर्श कॉलनी, मुसाभाई नगर, लालाजी नगर, फ्रेंडस कॉलनी, सुंदर नगरी, सिद्धी विनायक कॉलनी, अशा अनेक वसाहतींचा यात समावेश आहे. अनेक वसाहती निर्माण होत आहेत. काही वसाहती निर्माणाधिन आहेत.

याशिवाय नागभीड शहर नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हा स्थळांना मध्यवर्ती असल्याने अनेक चाकरनामे नागभीडला आता पसंती द्यायला लागले असून या वासाहतीमधील भूखंडांची विक्रीही जलदगतीने होत आहेत. अनेक टोलेजंग इमारती व बंगले या वसाहतींमध्ये उभे होत असले आणि लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या वसाहतीमध्ये अद्यापही बगिच्याची निर्मिती करण्यात आली नाही, हे विशेष. गेल्या काही वर्षात निवृत्त होणाºयांची संख्या वाढत असल्याने शहरात जेष्ठ नागरिकांची भर पडत आहे. या जेष्ठ नागरिकांना वेळ कुठे आणि कसा घालवावा, असा प्रश्न भेडसावत आहे. शहरात एखाद्या बगिच्याची निर्मिती झाल्यास जेष्ठ नागरिकांसमोर निर्माण होत असलेल्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते. याच बगिच्यात व्यायामाची साधने उपलब्ध करून दिल्यास मुले व तरूणांनाही दिलासा मिळू शकतो

वसाहतीच्या नियमानुसार प्रत्येक वसाहतीत ''''ओपन प्लेस'''' म्हणून मोकळे भूखंड ठेवण्यात आले आहेत. शहरात अशा मोकळ्या भूखंडांची संख्या २० च्या आसपास असल्याची माहिती आहे. यातील काही मोठया भूखंडावर बगिच्याची निर्मिती करण्यात आल्यास ते सर्वांना सोयीचे ठरू शकते. नागभीड नगर परिषदेने गेल्या तीन चार वर्षात ३८ कोटी रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते व बाजाराच्या विकासासाठी व इतर अनेक कामासाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे. असाच बगिच्याच्या निर्मितीसाठी निधीसाठी शासनाकडे साकडे घालावेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.