शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गडचांदूरकरांचे तालुक्याचे स्वप्न अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST

चंद्रपूर : जिवती व कोरपना या दोन तालुक्यांची आर्थिक बाजारपेठ म्हणून गडचांदूर या शहराची ओळख आहे. दोन्ही तालुक्यातील एक ...

चंद्रपूर : जिवती व कोरपना या दोन तालुक्यांची आर्थिक बाजारपेठ म्हणून गडचांदूर या शहराची ओळख आहे. दोन्ही तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. या शहराला तालुक्याची नितांत गरत असून, ४० ते ५० हजार असलेल्या या शहराभोवती अनेक गावे वसलेली आहेत. गडचांदूर तालुक्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू असून, नागरिक अद्याप प्रतीक्षेतच आहेत.

कोणत्याही कामानिमित्त सभोवतील अनेक गावांतील नागरिकांना सध्या कोरपना येथे विविध कामांसाठी जाणे-येणे करावे लागते. अतिदुर्गम भाग म्हणून कोरपना या तालुका जिल्ह्यात ओळखला जातो. वनसृष्टीने जिवती व कोरपना या दोन तालुक्यांना भरभरून दिले. हिरवाईचा शालू माणिकगड किल्ल्यांच्या पायथ्यापासून तर कोरपना पारडीपर्यंत नटलेला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गडचांदूर शहराला आघडीला बसस्थानक तसेच रेल्वेची सुविधा नाही. सिमेंट या क्षेत्राला मिळालेली एक देणगीच. त्यामुळे गडचांदूर या शहराची सिमेंट सिटी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, शहराचा हवा तसा विकास झाला नाही. शहराला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास अनेक सुविधा निर्माण होतील. सिमेंटचे चार कारखाने असूनसुद्धा परिसरात बेरोजगारी आहे. आजघडीला येथील अभियांत्रिकी केलेल्या शेकडो मुलांचे बस्तान परप्रांतात आहे. प्रदूषण आणि बेरोजगारी यामुळे येथील तरुण नाराज असल्याचे दिसते. भविष्यात हे शहर तालुका म्हणून उदयास आल्यास येथील तरुणांना विविध प्रकारचे रोजगार तसेच येथील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी वर्गाला एकप्रकारे सोयीचे होईल. जिवती आणि कोरपना या तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून गडचांदूर तालुका होणे महत्त्वाचे आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन गडचांदूर तालुका निर्मितीला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले

कोरोनामुळे यावर्षी प्रत्येकाचे अर्थचक्र बिघडले. बाहेरगावी शिक्षण तसेच रोजगारासाठी गेलेले युवक शहरात परतले आहे. मात्र त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे स्थानिक कंपनीत काम देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, तालुक्याचा दर्जा मिळाल्यास विकाला गती येऊन या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा, नागरिकांना आहे.