शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावलीतील चार वाघ जाणार नवेगावबांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 20:10 IST

Chandrapur News सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण निर्णय

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष पेटत आहे. यावर काही उपाय सुचवत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केवळ वाघांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. या आधारे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावून वाघांबाबत सर्वकष आढावा घेतला.

(Four tigers from Brahmapuri, Sindevahi and Savali will go to Navegaon)

यामध्ये सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. ताडोबा लगतच्या कोळसा व ऊर्जानगर परिसरात वाघांची संख्या वाढतीवर आहे. या अनुषंगाने चार झोन नव्याने तयार करण्याबाबत सादरीकरण झाले. या अनुषंगाने डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच निधीच्या कमतरतेकडे ना. वडेट्टीवारांनी लक्ष वेधताच या योजनेसाठी ५० कोटींवरून १०० कोटींची तरतूद करून १२० गावांना या योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी झाला.

यामध्ये सोलर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान देण्याचे ठरविण्यात आले. जंगलालगत शेती असल्यामुळे शेतकरी मशागत करीत नाही. अशा शेतकऱ्यांना १० हजार रुपये भरपाईची मागणी ना. वडेट्टीवारांनी केली असता नेमकी किती गावे आणि शेती अशी आहे. याचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

पर्यटनवाढीच्या दृष्टीने इको-टुरीझमसाठी अडीच कोटींची गरज असल्याची बाब पुढे आली. सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार, भद्रावती तालुक्यातील चोरा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, बल्लारपूर तालुक्यातील कोरवा व राजुरा तालुक्यातील जोगापूर येथे प्रायोगिक तत्वावर पहिला प्रयोग करण्याचा निर्णय यावेळी झाला. कोळसा, रानतळोधी व कारवा गावांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे.

जंगलात १०० खोद तळे व सोलर हातपंपांना तत्त्वता मान्यता प्रदान केली आहे. यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वाईल्ड लाईफचे प्रधान वनसंरक्षक आनंद लिमये, चंद्रपूरचे मुख्यवन संरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, व्हिडिओ कान्फरन्सिगद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्राधिकारी उपस्थित होते.

 

वडेट्टीवारांचे पत्र आणि मुख्यमंत्र्यांची बैठक

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या वाघांच्या हल्ल्याबाबत उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे. या अनुषंगाने उपाययोजनांसह विविध महत्त्वपूर्ण मागण्या असलेले पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. या पत्राचे गांभीर्य विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या विषयावर ही बैठक बोलाविली होती.

टॅग्स :Tigerवाघ