शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावलीतील चार वाघ जाणार नवेगावबांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 20:10 IST

Chandrapur News सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण निर्णय

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष पेटत आहे. यावर काही उपाय सुचवत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केवळ वाघांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. या आधारे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावून वाघांबाबत सर्वकष आढावा घेतला.

(Four tigers from Brahmapuri, Sindevahi and Savali will go to Navegaon)

यामध्ये सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. ताडोबा लगतच्या कोळसा व ऊर्जानगर परिसरात वाघांची संख्या वाढतीवर आहे. या अनुषंगाने चार झोन नव्याने तयार करण्याबाबत सादरीकरण झाले. या अनुषंगाने डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच निधीच्या कमतरतेकडे ना. वडेट्टीवारांनी लक्ष वेधताच या योजनेसाठी ५० कोटींवरून १०० कोटींची तरतूद करून १२० गावांना या योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी झाला.

यामध्ये सोलर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान देण्याचे ठरविण्यात आले. जंगलालगत शेती असल्यामुळे शेतकरी मशागत करीत नाही. अशा शेतकऱ्यांना १० हजार रुपये भरपाईची मागणी ना. वडेट्टीवारांनी केली असता नेमकी किती गावे आणि शेती अशी आहे. याचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

पर्यटनवाढीच्या दृष्टीने इको-टुरीझमसाठी अडीच कोटींची गरज असल्याची बाब पुढे आली. सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार, भद्रावती तालुक्यातील चोरा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, बल्लारपूर तालुक्यातील कोरवा व राजुरा तालुक्यातील जोगापूर येथे प्रायोगिक तत्वावर पहिला प्रयोग करण्याचा निर्णय यावेळी झाला. कोळसा, रानतळोधी व कारवा गावांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे.

जंगलात १०० खोद तळे व सोलर हातपंपांना तत्त्वता मान्यता प्रदान केली आहे. यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वाईल्ड लाईफचे प्रधान वनसंरक्षक आनंद लिमये, चंद्रपूरचे मुख्यवन संरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, व्हिडिओ कान्फरन्सिगद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्राधिकारी उपस्थित होते.

 

वडेट्टीवारांचे पत्र आणि मुख्यमंत्र्यांची बैठक

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या वाघांच्या हल्ल्याबाबत उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे. या अनुषंगाने उपाययोजनांसह विविध महत्त्वपूर्ण मागण्या असलेले पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. या पत्राचे गांभीर्य विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या विषयावर ही बैठक बोलाविली होती.

टॅग्स :Tigerवाघ