शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव ...

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव दुकान, दूध व्यवसाय, आईस गोला, लस्सी सेंटर, ज्युस सेंटर व इतर व्यवसाय परिसरात सुरू केले होते. परंतु कोरोना या संकटामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असून आता तर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही मोठे संकट ओढावले आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवायास सुरुवात केली. परंतु सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तथा संचारबंदी लागू केली. शेतकरी शेतात असलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लहान लहान दुकान थाटून व्यापारी पेक्षा कमी दरात नागरिकांना उपलब्ध करतो. मात्र आता सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाल्यांची दुकाने असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. उन्हाळा सुरू असून लग्न समारंभाला सुरुवात झाली होती व शेतातील भाजीपाला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात व लग्न समारंभामध्ये विकत असायचे. कोरोनामुळे मागील वर्षी व यावर्षीसुद्धा लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता येत नाही.

बॉक्स

आठवडे बाजारही बंद

शंकरपूरला दर सोमवारी आठवडे बाजार भरत असून परिसरातील २८ खेडी जोडलेली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आठवडे बाजार भरवण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेले वांगे, टाेमाॅटाे, पालक, सांबार, कांदे, गोबी, कारले, तसेच टरबूज व इतर भाजीपाल्यांची विक्री मंदावली आहे. शेतात राबराब राबून भाजीपाला पिकवायचा आणि तो शेतातच ठेवायचा, अशी स्थिती झाली आहे.

बॉक्स

उरलेला भाजीपाला जनावरांना

मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होऊनही तो विकता येत नसल्याने अनेक शेतकरी भाजीपाला जनावरांना चारणे किंवा फेकून देणे पसंत करत आहेत. आधीच दुष्काळ, नापिकी अशा सर्वच बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाने ही पुन्हा चिंतेत टाकण्याचे काम केले आहे. एकूणच मागील चार पाच वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या वक्रदृष्टीने तर कधी शेतकरी विरोधी धोरणामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता या टाळेबंदीने पुन्हा त्याला आर्थिक संकटात ओढले आहे.

कोट

आज माझ्या शेतात पालक, चवळी, भेंडी, वांगे यासारखे भाजीपाला पीक घेतले आहे. परंतु ठोक व्यापारी खरेदीसाठी येत नाही. माल मोठ्या प्रमाणात निघत असल्याने तेवढा भाजीपाला चिल्लरमध्ये विकल्या जात नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

-स्वप्नील सावरकर, शेतकरी, शंकरपूर.