शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 2:22 PM

वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे.

चंद्रपूर – वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. 

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही़ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आपली आत्मबळ यात्रा सुरू असून, विदभार्साठी सर्व पर्याय खुले आहेत़. वेळ आल्यास आमदारकीचा त्याग करू. त्यामुळे भाजपाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार आशिष देशमुख यांनी करीत भाजपाला घरचा अहेर दिला़.  शेतकरी, बेरोजगार युवकांच्या समस्यांसह स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे काटोलचे आमदार डॉ़ आशिष देशमुख यांनी विदर्भ आत्मबळ यात्रा काढली. ही यात्रा गुरूवारी चंद्रपुरात पोहोचली़ यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपा सरकारच्या धोरणावर टिका केली. सुरुवातीपासूनच आपण विदर्भ राज्यासाठी संघर्ष करीत असून, यापूर्वी बेमुदत उपोषणसुद्धा केले होते़ त्यावेळी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार सत्तेवर येताच विदर्भ राज्य करू, असे आश्वासन दिले होते़. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा विदर्भ राज्यासाठी अशासकीय ठरावसुद्धा मांडले आहेत़ मात्र, त्यांनी आता विदर्भ राज्याच्या मागणीवर चुप्पी साधली आहे, असे ते म्हणाले.

विदर्भात सर्वाधिक वीजनिर्मिती होते. सर्वाधिक कोळसा उत्पादन होते़ या उद्योगिकीकरणामुळे निर्माण प्रदूषणाचे चटके येथील जनतेला बसत आहे़ मात्र, येथील जनतेला २४ तास वीज मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली़भाजपा सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे़ आगामी काळात हा रोष दिसून, येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले़ विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपाचे आणखी काही आमदार आपल्यासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शंकरपूर, भिसीत स्वागतआमदार आशिष देशमुख यांच्या विदर्भ आत्मबळ यात्रेचे शंकरपूर व भिसीत दुपारच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्या सोबत जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर, डॉ. रमेश गजबे, पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावणकर, अमोद गौरकर, रामभाऊ भांडारकर, शामराव बोरकर, नितीन सावरकर, मोरेश्वर झाडे, प्राचार्य जाने यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी भिसीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शंकरपूर येथेही सभा झाली.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा