शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे.  ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी  २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत.

ठळक मुद्देबोगस बियाण्यांचाही धोका : कास्तकारांपुढे अनंत अडचणी

वसंत खेडेकरलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बियाण्यांच्या किमती दरवर्षी वाढत जात आहेत. यंदाही त्या बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत. वाढलेला हा खर्च कसा पेलायचा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या सोबतच बोगस बियाणे हा संभाव्य धोकाही  त्यांना अस्वस्थ करतो आहे.यंदा पाऊस दमदार बरसणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्याचप्रमाणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे.  ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी  २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत. त्याप्रमाणे सर्व बियाण्यांचे भाव ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. कितीही किंमत वाढली तरी बियाणे खरेदी करणे आहेच. दुसरा पर्याय नाही. कसेही करून बियाणे घेतले तरी दुसरा एक धोका कास्तकारांना पुढे बोगस बियाण्यांचा असतो. खर्च करून बियाणे विकत घेतले आणि कष्ट करूनही ते उगवले नाही. उगवले तरी त्यावर फुल-फळ उगवले नाही तर वर्षभराची मेहनत वाया जाते. सारे नियोजन कोलमडून जाते. असा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. तरीही मोठ्या आशेने कास्तकार पेरणी करीत आहेत.

गतवर्षी बियाणे उगवले; मात्र फळधारणा नाहीयेथील प्रगतशील कास्तकार राजू शर्मा यांनी गतवर्षी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. झाड उगवले पण फळ जेमतेमच आले. निराशा होऊन त्यांनी त्यावरून ट्रॅक्टर चालविला. असे अनेक ठिकाणी घडले आहे. बोगस बियाणाबाबत कास्तकारांकडून  कृषी विभागाकडे तक्रारी केल्या जातात. मात्र पुढे त्यांचे काहीच होत नाही. असे याबाबत सात शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्याकडून कास्तकार नागविले जात राहतील. कास्तकारांना निसर्ग आपत्तीला तोंड द्यावे लागतेच. सोबतच अशा प्रवृत्तीच्या लोकांपुढे त्यांचे अतोनात नुकसान होते.  

बोगस बियाणे कसे ओळखायचे?खरेदी करून आणलेल्या बियाणांच्या पिशवीतून मूठभर दाणे पाण्यात भिजवून ओल्या कपड्यात हवेशीर जागेत तीन दिवस ठेवायचे. चवथ्या दिवशी त्या सर्वांमधून अंकुर फुटले तर ते पेरणीयोग्य समजावे. कृषी विभागाकडूनही ही पद्धत सांगितली जाते. प्रचलित दुसरी पद्धत अशी म्हणजे बादलीतील पाण्यात बियाणे टाकायचे. थोड्या वेळाने जे तळाशी बसतील, ते योग्य, वर तरंगणारे अयोग्य. या दोन्ही पद्धती वेळ जात असला तरी त्यामुळे धोका टाळता येतो.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती