पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:21+5:30
नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मृग नक्षत्रातील दोन-तीन दिवस वगळल्यास जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाच नाही. मात्र, खरीप हंगाम टळेल या धास्तीने हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पेरणी केली. अंकूर उगवले परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. धान उत्पादक ९० टक्के शेतकऱ्यांनी तर अद्याप पºहेच भरले नाही. त्यामुळे यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
मृग नक्षत्र संपून सोमवारी आद्रा नक्षत्र सुरू झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात सुमारे ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांची वर्तविली आहे. आतापर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतातील विहिरी कोरड्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांकडे कृषीपंप असले तरी पाणीच नसल्याने धानाचे पºहे जगवायचे कसे, असा प्रश्न विचारत आहेत. शिवारातील जलस्त्रोतांची पातळी चिंताजनक आहे. शेतीला लागून असलेले नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यावर्षीचा शेतीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरविणारा असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन उगविलेच नाही
राजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही. त्यामुळे मजूर लावून हाताने टोबणी करीत आहेत. बियाणे न उगविल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाºयांकडे केल्या जात आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी वरोरा व भद्रावती येथील शेतकºयांनी केली.
दुबार पेरणीचे संकट
खडसंगी : परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पेरणी केली. धानाचे पºहे टाकले. बियाण्यांना कोंब आले असताना अचानक पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. खडसंगी परिसरामध्ये कोरडवाहू शेती करणाºयांचीच संख्या अधिक आहे. पावसाने साथ दिली तरच शेती अन्यथा कष्टाची माहिती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
लखमापूर परिसरातील पेरणी रखडली
लखमापूर : कोरपना तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात समाधानकारक ओलावा असेल तरच पेरणी केली जात आहे. यंदा कापूस बियाण्यांची लागवड अधिक प्रमाणात झाली. सोयाबीन लागवड करणारे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर कपाशीचे मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे.