शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गडचांदुरात शेतकरी, कामगारांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:36 IST

राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र लढा उभारण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगारांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.गडचांदूर येथील राजीव गांधी (पेट्रोल पंप) चौकात शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे गजानन गावंडे, गोदरू पाटील जुमनाके, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, शिवचंद्र काळे, नासीर खान, अ‍ॅड. मेघा भाले, तारासिंग कलशी, देवेंद्र गहलोत, प्रवीण पडवेकर, अ‍ॅड. अरुण धोटे, हंसराज चौधरी, विजय ठाकुरवार, सागर ठाकुरवार, अशोक नागापुरे, वहाब भाई, सरपंच विठ्ठल टोंगे, उपसरपंच अनिल गिरीले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी व कामगार धोरणावर टिका केला. सध्याचे मोदी व फडणवीस सरकार शेतकरी व कामगार तसेच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला.चंद्रपूर जिल्ह्यात बारामाही नद्या असताना सिंचनाच्या दृष्टीने बंधारे नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन कामगार नेते साईनाथ बुचे यांनी केले. आभार अजय मानवटकर यांनी मानले. याप्रसंगी जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.