शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

शेतकरी आत्महत्येची ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:40 IST

जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांमध्ये नाराजी। प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित आहेत. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून कुटुंबीयांनी केली आहे.जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु शेतकरी आत्महत्यांची संख्या अजुनही घटली नाही. जिल्ह्यात २००३ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली होती. २००४ वर्षात जिल्ह्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पण, यातील पाच प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. २००५ रोजी ही संख्या १७ झाली. २००६ या वर्षात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २४ कुटुंबांनाच सरकारकडून मदत मिळाली. २०१४ पासून २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने व्यक्तीगत व सामूहिक लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या. परंतु, ग्रामीण भागात योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कृषी धोरणाच्या अंमलबजावणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे २०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकरी आत्महत्या केल्या. ५२ पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी ११ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे असहकार्य२०१८ मध्ये ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ३५ प्रकरणात शासनाकडून मदत मिळाली. १३ प्रकरणे अपात्र ठरली. जानेवारी ते फेबु्रवारी २०१९ दरम्यान सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या. परंतु, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. खरीप हंगामाला सुरूवात झाली. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकार्य मिळत नाही. हाच प्रकार सुरू राहिल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या