शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

शेतकरी आत्महत्येची ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:40 IST

जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांमध्ये नाराजी। प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीपासून वंचित आहेत. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून कुटुंबीयांनी केली आहे.जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु शेतकरी आत्महत्यांची संख्या अजुनही घटली नाही. जिल्ह्यात २००३ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली होती. २००४ वर्षात जिल्ह्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पण, यातील पाच प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. २००५ रोजी ही संख्या १७ झाली. २००६ या वर्षात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २४ कुटुंबांनाच सरकारकडून मदत मिळाली. २०१४ पासून २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने व्यक्तीगत व सामूहिक लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या. परंतु, ग्रामीण भागात योजनांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कृषी धोरणाच्या अंमलबजावणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे २०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकरी आत्महत्या केल्या. ५२ पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ११ प्रकरणे फेरचौकशीसाठी ११ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे असहकार्य२०१८ मध्ये ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ३५ प्रकरणात शासनाकडून मदत मिळाली. १३ प्रकरणे अपात्र ठरली. जानेवारी ते फेबु्रवारी २०१९ दरम्यान सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या. परंतु, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. खरीप हंगामाला सुरूवात झाली. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकार्य मिळत नाही. हाच प्रकार सुरू राहिल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या