शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांसाठी शेतकऱ्यांची सर्वत्र शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:18 IST

शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.

ठळक मुद्देशेजारच्या जिल्ह्यातून मजूर बोलावले धान कापणी व कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे कामासाठी या भागातील मजूरवर्ग इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या धान कापणी व कापूस वेचणीची कामे केली जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.गोंडपिपरी तालुक्यात धान पिकाचे सर्वाधिक उत्पादक घेतले जाते. मात्र तालुक्यात सिंचनाची सुविधा फारशी नसल्याने अनेकांनी यंदा धानासोबत कापसाचे पीक घेतले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ठाकले होते. त्यानंतर बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धान, कापसाचे पीक घेतले. मोठ्या कष्टाने हे पीक जगविले. आता धान कापणीच्या अवस्थेत आहे. कापूस काढणीचा हंगाम आहे. शेतशिवार पांढरे शुभ्र दिसत आहे.आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कापूस शेतात फूटलेला आहे. धानासह कापूस वेचण्याचा हंगाम एकत्र आल्याने मजुरांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या शोधात परिसरात भटकंती करीत आहे. पाच ते सहा रुपये प्रती किलो कापूस वेचणीचा दर आहे. जादा पैसे आणि जाण्या-येण्याच्या खर्चाचे आमिष दाखवूनही मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक जण इतर जिल्ह्यातून मजुरांना आणून कापूस वेचणीची कामे करीत आहेत.उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यतायावर्षीच्या अत्यल्प पावसाने व विविध रोगामुळे धान व कापूस उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत. पिकाला मिळत असलेल्या अल्पशा भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धान कापणी व कापूस वेचणीला लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. धान रोवणीपासून ते कापूस काढण्याच्या मशागतीला लागणारा खर्च वजा करता शेती न परवडण्यासारखी झाली आहे. मजुरांच्या अभावामुळे धानाचे पुंजणे आणि कापसाचे बोंडही शेतकऱ्यांच्या घरात अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी