शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांसाठी शेतकऱ्यांची सर्वत्र शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:18 IST

शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.

ठळक मुद्देशेजारच्या जिल्ह्यातून मजूर बोलावले धान कापणी व कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे कामासाठी या भागातील मजूरवर्ग इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या धान कापणी व कापूस वेचणीची कामे केली जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून मजूर आणून कापूस वेचणीची कामे करावी लागत आहेत.गोंडपिपरी तालुक्यात धान पिकाचे सर्वाधिक उत्पादक घेतले जाते. मात्र तालुक्यात सिंचनाची सुविधा फारशी नसल्याने अनेकांनी यंदा धानासोबत कापसाचे पीक घेतले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर ठाकले होते. त्यानंतर बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धान, कापसाचे पीक घेतले. मोठ्या कष्टाने हे पीक जगविले. आता धान कापणीच्या अवस्थेत आहे. कापूस काढणीचा हंगाम आहे. शेतशिवार पांढरे शुभ्र दिसत आहे.आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कापूस शेतात फूटलेला आहे. धानासह कापूस वेचण्याचा हंगाम एकत्र आल्याने मजुरांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या शोधात परिसरात भटकंती करीत आहे. पाच ते सहा रुपये प्रती किलो कापूस वेचणीचा दर आहे. जादा पैसे आणि जाण्या-येण्याच्या खर्चाचे आमिष दाखवूनही मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक जण इतर जिल्ह्यातून मजुरांना आणून कापूस वेचणीची कामे करीत आहेत.उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यतायावर्षीच्या अत्यल्प पावसाने व विविध रोगामुळे धान व कापूस उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत. पिकाला मिळत असलेल्या अल्पशा भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धान कापणी व कापूस वेचणीला लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. धान रोवणीपासून ते कापूस काढण्याच्या मशागतीला लागणारा खर्च वजा करता शेती न परवडण्यासारखी झाली आहे. मजुरांच्या अभावामुळे धानाचे पुंजणे आणि कापसाचे बोंडही शेतकऱ्यांच्या घरात अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी