शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:42 IST

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाचे तब्बल ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपयांचे चुकारे शासनाने थकविले. चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. तूर्तास हंगामासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यातील सर्वच तालुक्यांची अर्थव्यवस्था धान पिकावरच अवलंबून आहे. साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक हाती येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर जातात. सध्या जिल्ह्यात पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रांमार्फत धानाची खरेदी केली जात आहे. पणन महासंघ संचालन करीत असलेले ४३ आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे चुकारे देण्यात आले नाही. 

आदिवासी महामंडळाचे १८ केंद्र पणन महासंघाप्रमाणेच जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडूनही १८ आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. महामंडळाने धानाचे चुकारे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. मात्र, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आदिवासी विकास महामंडळाकडे किती चुकारे अडले आहेत, याबाबत संपर्क साधला पण याचा तपशील मिळू शकला नाही.

फक्त ५ कोटी १९ लाख मिळाले पणन महासंघाच्या २१ जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, २ हजार ३०० रुपये खरेदी दरानुसार या धानाची किंमत २५ कोटी १३ लाख २७ हजार ४९५ रुपये आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ५ कोटी १९ लाख ९८ हजार अदा करण्यात आले. शासनाकडे ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपये शिल्लक आहेत.

काहींना रुपयाही मिळाला नाही काही शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच धानाची विक्री केली; पण त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हंगामावर झालेल्या खर्चाची २ परतफेड धान विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून करायची आहे. कोणाला हंगामासाठी गहाण केलेले सोने सोडवायचे तर कुणाला सोसायटी व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडायचे आहे.

"जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून चुकाऱ्यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. चुकारे त्वरित मिळावेत, यासाठी आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे." - व्ही. एस. तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, चंद्रपूर

"दीड महिन्यापूर्वी थान विकले. हंगामावर झालेल्या खर्चाची रक्कम परतफेड करायची आहे; पण अद्याप एकही पैसा मिळाला नाही." - दिवाकर रामदास कुळे, शेतकरी, मिथूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र