शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:42 IST

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाचे तब्बल ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपयांचे चुकारे शासनाने थकविले. चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. तूर्तास हंगामासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यातील सर्वच तालुक्यांची अर्थव्यवस्था धान पिकावरच अवलंबून आहे. साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक हाती येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर जातात. सध्या जिल्ह्यात पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रांमार्फत धानाची खरेदी केली जात आहे. पणन महासंघ संचालन करीत असलेले ४३ आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे चुकारे देण्यात आले नाही. 

आदिवासी महामंडळाचे १८ केंद्र पणन महासंघाप्रमाणेच जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडूनही १८ आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. महामंडळाने धानाचे चुकारे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. मात्र, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आदिवासी विकास महामंडळाकडे किती चुकारे अडले आहेत, याबाबत संपर्क साधला पण याचा तपशील मिळू शकला नाही.

फक्त ५ कोटी १९ लाख मिळाले पणन महासंघाच्या २१ जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, २ हजार ३०० रुपये खरेदी दरानुसार या धानाची किंमत २५ कोटी १३ लाख २७ हजार ४९५ रुपये आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ५ कोटी १९ लाख ९८ हजार अदा करण्यात आले. शासनाकडे ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपये शिल्लक आहेत.

काहींना रुपयाही मिळाला नाही काही शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच धानाची विक्री केली; पण त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हंगामावर झालेल्या खर्चाची २ परतफेड धान विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून करायची आहे. कोणाला हंगामासाठी गहाण केलेले सोने सोडवायचे तर कुणाला सोसायटी व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडायचे आहे.

"जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून चुकाऱ्यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. चुकारे त्वरित मिळावेत, यासाठी आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे." - व्ही. एस. तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, चंद्रपूर

"दीड महिन्यापूर्वी थान विकले. हंगामावर झालेल्या खर्चाची रक्कम परतफेड करायची आहे; पण अद्याप एकही पैसा मिळाला नाही." - दिवाकर रामदास कुळे, शेतकरी, मिथूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र