शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:42 IST

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाचे तब्बल ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपयांचे चुकारे शासनाने थकविले. चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. तूर्तास हंगामासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यातील सर्वच तालुक्यांची अर्थव्यवस्था धान पिकावरच अवलंबून आहे. साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक हाती येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर जातात. सध्या जिल्ह्यात पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रांमार्फत धानाची खरेदी केली जात आहे. पणन महासंघ संचालन करीत असलेले ४३ आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे चुकारे देण्यात आले नाही. 

आदिवासी महामंडळाचे १८ केंद्र पणन महासंघाप्रमाणेच जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडूनही १८ आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. महामंडळाने धानाचे चुकारे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. मात्र, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आदिवासी विकास महामंडळाकडे किती चुकारे अडले आहेत, याबाबत संपर्क साधला पण याचा तपशील मिळू शकला नाही.

फक्त ५ कोटी १९ लाख मिळाले पणन महासंघाच्या २१ जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, २ हजार ३०० रुपये खरेदी दरानुसार या धानाची किंमत २५ कोटी १३ लाख २७ हजार ४९५ रुपये आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ५ कोटी १९ लाख ९८ हजार अदा करण्यात आले. शासनाकडे ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपये शिल्लक आहेत.

काहींना रुपयाही मिळाला नाही काही शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच धानाची विक्री केली; पण त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हंगामावर झालेल्या खर्चाची २ परतफेड धान विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून करायची आहे. कोणाला हंगामासाठी गहाण केलेले सोने सोडवायचे तर कुणाला सोसायटी व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडायचे आहे.

"जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून चुकाऱ्यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. चुकारे त्वरित मिळावेत, यासाठी आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे." - व्ही. एस. तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, चंद्रपूर

"दीड महिन्यापूर्वी थान विकले. हंगामावर झालेल्या खर्चाची रक्कम परतफेड करायची आहे; पण अद्याप एकही पैसा मिळाला नाही." - दिवाकर रामदास कुळे, शेतकरी, मिथूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र