शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली.

ठळक मुद्देतातडीच्या मदतीची गरज : अनेक भागात ओला दुष्काळसदृश्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात संततधार पाऊस पडला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पुढच्या वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने पिकांचे आधी सर्वेक्षण करावे व शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी आता शेतकरी करू लागले आहे.यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली. अनेक दिवस हा पाऊस कायम राहिला. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव, मोठे सिंचन प्रकल्प तुडूंब भरले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांची पीक बचावले. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने आपली झड सुरू केली. आता ५ आणि ६ सप्टेबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस आला.ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. या पावसामुळे अनेक तलाव फुटले, सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. इरई धरणाचेही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरले. कापूस, सोयाबीन व धानपिके पाण्याखाली आली. चांगली भरात आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हे नुकसान भरून निघणारे नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीच्या बळावरच त्यांच्या कुटुंबांचा पुढील वर्षाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. महसूल विभागाने सर्वप्रथम जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करावे आणि तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.सर्वेक्षण विलंबाने झाल्यास नुकसानआता शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाली आहे. आताच महसूल विभागाने सर्वक्षण केले तर खरी परिस्थिती त्यांना कळेल. सर्वेक्षण उशिराने झाल्यास कितपत पिके उद्ध्वस्त झाली, याची अचुक माहिती महसूल कर्मचाऱ्यांना कळणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार नाही.गावात बसून सर्व्हे नकोजिल्ह्यात पिके पुराच्या पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणारी ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा वेळी महसूल कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केले नाही. गावातील चौकात बसून कागदपत्र रंगविण्यात आली. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. हा अनुभव पाठिशी असल्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती