शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे जतन आणि प्रदूषणावर नियंत्रण कायद्याचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही.

माजरी : राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे या योजनेचा बट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होवून ५३ वर्ष झाली. उशिरा का होईना सरकारला जाग आली. पर्यावरणाचा समतोल राखूण गावांचा शाश्वत विकास व्हावा हा पर्यावरण संतुलन समृध्द ग्राम योजनेचा केंद्रबिंदु आहे. यामध्ये पर्यावरणाला घातक नसतील, असे घटक वापरून विकासाचे बिज रूजविले जातील आणि ग्रामीण भागाचे स्वरूप मुळापासूनच बदलण्याची क्षमता असणारी ही अभिनव योजना आहे, असे पर्यावरण विभागाने तीन वर्षापूर्वी म्हटले होते.मात्र, तीन वर्षापासून ही योजना कुठे, कशी राबविली, जिल्ह्यातील ग्रामस्थांना खरोखरच लाभ मिळाला काय, या प्रश्नांचे अद्यापही प्रशासनाकडे नाही. राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फतीने या योजनेच्या माध्यमातून समृध्द गाव आणि संपन्न ग्रामस्थ बनविण्याची संकल्पना आहे. संबंधित विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण राजकीय पुढारी-नेते यांची इच्छाशक्ती यापुढे किती उपयोगात आणेल, ही येणारी वेळच सांगु शकेल.या योजनेत पुढच्या पिढीचा विचार करून जागतीक वाढत्या तापमानाला सामोरे जाण्याची किंवा ते प्रश्न गावस्तरावरच सोडविण्याची क्षमता विकसीत करणाऱ्या उद्देशाने योजना कार्यान्वित करण्यात आली. शुद्ध पिण्याचे पाणी, पाण्याचा पुर्नवापर, पुर्नभरणा या संदर्भात ग्रामीण क्षेत्रात फारसा विचार होताना दिसून येत नाही. (वार्ताहर)