शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

हत्तीरोग औषध वितरण मोहीम थांबवली ! वितरण करताना तुटू लागल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:41 IST

Chandrapur : जिल्ह्यातील हत्तीरोग औषधोपचार मोहीम, गोळ्या दिल्लीला पाठवल्या

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातून सर्वाधिक हत्तीरोगाचे ९ हजार ३२१ रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याने आरोग्य विभागाने सोमवारपासून (दि. १०) प्रतिबंधात्मक गोळी वितरण मोहीम सुरू केली होती. मात्र, स्ट्रीपमधून बाहेर काढताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही मोहीम तडकाफडकी थांबवून राज्य शासनाला कळविले. राज्याकडून दिल्लीला अहवाल गेल्याने २९ लाख ९७ हजार गोळ्या रिप्लेस करून देण्याचा संयुक्त निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातून सर्वाधिक रुग्णसंख्या चंद्रपूर जिल्ह्यात असल्याने हा जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, हत्तीरोग दुरीकरणासाठी सोमवारपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू करण्यात आली. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ११ लाख ९४ हजार ३५७पात्र नागरिकांना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन होते. चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व विमूर या १० तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक असल्याने विशेष फोकस ठेवला. आरोग्य पथक घरोघरी भेट देऊन नागरिकांना गोळ्या खाऊ घालत होते. दरम्यान, स्ट्रीपमधून गोळी काढली की तुटत असल्याचे दिसून आले. पथकाने ही बाब जिल्हा हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी राज्य शासन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांना माहिती दिली. त्यानंतर मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, नवीन गोळ्या येईपर्यंत मोहीम तत्काळ थांबविण्यात आली आहे.

नवीन गोळ्या आल्यानंतर सुरू होणार मोहीमनवीन गोळ्या आल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू होईल. जिल्ह्यातील १०३० गावांत व २२ वॉर्डातील १२ लाख ५४ हजार ५१० पैकी ११ लाख २४ हजार ३५७ पात्र व्यक्तींना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले.

११ लाख ९४ हजार ३५७ नागरिकांना गोळ्या खाऊ घालणारमोहिमेसाठी २१ व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्येक गावांत एक बूथ याप्रमाणे एकूण १ हजार २५३ बूथ निश्चित केले. २ हजार २२० आरोग्य कर्मचारी, ३१५ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली

गोळ्यांतील 'कटेंट ओके'केंद्र सरकारच्या अधिनस्थ यंत्रणेकडून जिल्ह्यासाठी २९ लाख ९७ हजार प्रतिबंधात्मक गोळ्या पाठविल्या होत्या. गोळ्यांचे उत्पादन नियम व नामांकनानुसार 'कटेंट ओके' आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गोळ्या स्ट्रीपमधून बाहेर काढताना तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबईला कळविले. मुंबईने ही बाब दिल्लीच्या लक्षात आणून दिली.

"जिल्ह्याला प्राप्त झालेल्या गोळ्यांबाबत जी समस्या निर्माण झाली, ती माहिती शासनाला कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसारच मोहीम थांबविण्यात आली."- डॉ. प्रकाश साठे, हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी, चंद्रपूर

"गोळ्यांमधील कटेंटबाबत शंका नाही. मात्र, वितरण करताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्याने मोहीम थांबवली. सर्व गोळ्या रिप्लेस करून मिळणार आहेत. गोळ्या आल्यानंतर, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पुन्हा सुरू केली जाईल."- डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य, अधिकारी, चंद्रपूर

अशी आहे रुग्णसंख्याब्रह्मपुरी                १५९७नागभीड               १०७१सावली                 १०३४चिमूर                   ९६७सिंदेवाही               ७७९वरोरा                   ५७३भद्रावती                ५५१मूल                      ४८७गोंडपिपरी             ४२३चंद्रपूर                  ३४९राजुरा                   ३२९पोंभुर्णा                  ३०८बल्लारपूर             २३३कोरपना                २१८जिवती                    १८मनपा क्षेत्र              ३८४एकूण                 ९३२१ 

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर