शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

झिरो बजेटमध्ये होणार जिल्ह्यात शिक्षण दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविली जाणार आहे.  विशेष म्हणजे, यासाठी कोणताही निधी खर्च केला जाणार नसून झिरो बजेटमध्ये  विद्यार्थ्यांना समजेल, अशा पद्धतीने शिकविले जाणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थीशिक्षणापासून काही प्रमाणात दूर गेले आहे. सद्य:स्थितीत शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहिजे तशी चांगली नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच शैक्षणिक स्तर वाढवून त्यांना स्पर्धा परीक्षेला तयार करण्यासाठी सीईओ मिताली सेठी यांनी जिल्ह्यात शिक्षणदान हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये गावातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज दोन तास नि:शुल्क शिकविले जाणार आहे. हा उपक्रम पुढील चार महिने सुरू राहणार आहे.जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही निधी खर्च केला जाणार नसून झिरो बजेटमध्ये  विद्यार्थ्यांना समजेल, अशा पद्धतीने शिकविले जाणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाणार आहे.

अशी आहे शिक्षण दान संकल्पनादान ही आपल्या देशातील परंपरा आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार काही तरी दान करत असतो. आपण समाजाचे काही देणे लागले, या भावनेतून एकत्र  येऊन आपल्या जवळ असलेले शिक्षण दान केले तर गावातील लहान मुलांना शिक्षणासाठी आपण सहकार्य करू शकतो. शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी दान केली तरी संपत नाही, उलट वाढतच जाते. त्यामुळेच जिल्ह्यात शिक्षण दान ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

पुढील चार महिने  चालणार उपक्रमजिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये दररोज दोन तास स्वयंसेवकांच्या माध्यमातून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिकविले जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील चार महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांनंतर आणि चार महिन्यांनंतर विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रगती तपासणी जाणार आहे.

हे आहे लाभार्थीइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारे विद्यार्थी. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी राहणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, गणित शिकविण्यात येणार आहे. 

मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी काही प्रमाणात शिक्षणापासून दूर गेले आहे. त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणून त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. त्यातील कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांना गरूडझेप अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी कुठेच मागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-मिताली सेठी सीईओ चंद्रपूर

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण