शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्त्यांअभावी चिखलातून शेतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:55 IST

मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात.

ठळक मुद्देलाठी परिसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी हंगामातील शेतीची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडपिपरी तालुकातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यांचे बांधकाम न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे. लाठी गावठान ते अंतरगाव शिवारात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पांदण रस्त्यावर चिखल झाला आहे. बैलगाडीसह शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले.लाठी परिसरातील जनता शेतीवरच उदरनिर्वाह करते. त्यामुळे शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. खरीप हंगामातील पिके हाती येत आहेत. परंतु कापणी अथवा चुरणे केल्यानंतर गावात शेतमाल कसे आणायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पावसाळ्यात पांदण रस्त्याअभावी शेतीची कामे खोळंबतात.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तातडीने पांदण रस्ता निर्माण करण्यास मंजुरी देण्याची मागणी सरपंच सुमन गेडाम, देवराव म्हरस्कोले, श्रीकृष्ण कोसरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.विकास योजना गेल्या कुठे?मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात. परंतु, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना राबविण्यात गांभिर्याने प्रयत्न झाले नाही. त्याचे अनिष्ठ परिणाम, या भागातील शेतीवर झाले आहेत.नुकसान भरपाईची प्रतीक्षाखरीप हंगामातील पिके हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लाठी, सरांडी, वामनपल्ली, पोडसा, सोनापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली. खरीपातील लागवडीची खर्च निघेल की नाही, याचीच चिंता आहे. महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर शासनाने भरपाई जाहीर केली. परंतु, ती तुटपुंजी आहे. शिवाय, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी हतबललाठी परिसरातील बहुतांश गावे वन परिसराला लागून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला आदींसह कडधान्याची पिके घेतली जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. पंचनामे करून भरपाई देण्यास विलंब होतो. कागदपत्र गोळा करण्यातच शेतकऱ्यांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. नुकसानीच्या तुलनेत अल्प भरपाई मिळत असल्याने शेतकरी हैराण आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकºयांनी केली.पांदण रस्त्यांची समस्या यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत त्रासदायक ठरली. या हंगामातील पीक काढल्यानंतर बैलगाडीने घरी आणता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करीत आहे.-साईनाथ कोडापे, संचालककृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती