शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पांदण रस्त्यांअभावी चिखलातून शेतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:55 IST

मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात.

ठळक मुद्देलाठी परिसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी हंगामातील शेतीची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडपिपरी तालुकातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यांचे बांधकाम न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे. लाठी गावठान ते अंतरगाव शिवारात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पांदण रस्त्यावर चिखल झाला आहे. बैलगाडीसह शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले.लाठी परिसरातील जनता शेतीवरच उदरनिर्वाह करते. त्यामुळे शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. खरीप हंगामातील पिके हाती येत आहेत. परंतु कापणी अथवा चुरणे केल्यानंतर गावात शेतमाल कसे आणायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पावसाळ्यात पांदण रस्त्याअभावी शेतीची कामे खोळंबतात.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तातडीने पांदण रस्ता निर्माण करण्यास मंजुरी देण्याची मागणी सरपंच सुमन गेडाम, देवराव म्हरस्कोले, श्रीकृष्ण कोसरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.विकास योजना गेल्या कुठे?मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात. परंतु, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना राबविण्यात गांभिर्याने प्रयत्न झाले नाही. त्याचे अनिष्ठ परिणाम, या भागातील शेतीवर झाले आहेत.नुकसान भरपाईची प्रतीक्षाखरीप हंगामातील पिके हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लाठी, सरांडी, वामनपल्ली, पोडसा, सोनापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली. खरीपातील लागवडीची खर्च निघेल की नाही, याचीच चिंता आहे. महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर शासनाने भरपाई जाहीर केली. परंतु, ती तुटपुंजी आहे. शिवाय, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी हतबललाठी परिसरातील बहुतांश गावे वन परिसराला लागून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला आदींसह कडधान्याची पिके घेतली जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. पंचनामे करून भरपाई देण्यास विलंब होतो. कागदपत्र गोळा करण्यातच शेतकऱ्यांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. नुकसानीच्या तुलनेत अल्प भरपाई मिळत असल्याने शेतकरी हैराण आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकºयांनी केली.पांदण रस्त्यांची समस्या यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत त्रासदायक ठरली. या हंगामातील पीक काढल्यानंतर बैलगाडीने घरी आणता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करीत आहे.-साईनाथ कोडापे, संचालककृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती