शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पांदण रस्त्यांअभावी चिखलातून शेतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:55 IST

मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात.

ठळक मुद्देलाठी परिसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी हंगामातील शेतीची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडपिपरी तालुकातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यांचे बांधकाम न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे. लाठी गावठान ते अंतरगाव शिवारात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पांदण रस्त्यावर चिखल झाला आहे. बैलगाडीसह शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले.लाठी परिसरातील जनता शेतीवरच उदरनिर्वाह करते. त्यामुळे शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. खरीप हंगामातील पिके हाती येत आहेत. परंतु कापणी अथवा चुरणे केल्यानंतर गावात शेतमाल कसे आणायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पावसाळ्यात पांदण रस्त्याअभावी शेतीची कामे खोळंबतात.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तातडीने पांदण रस्ता निर्माण करण्यास मंजुरी देण्याची मागणी सरपंच सुमन गेडाम, देवराव म्हरस्कोले, श्रीकृष्ण कोसरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.विकास योजना गेल्या कुठे?मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात. परंतु, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना राबविण्यात गांभिर्याने प्रयत्न झाले नाही. त्याचे अनिष्ठ परिणाम, या भागातील शेतीवर झाले आहेत.नुकसान भरपाईची प्रतीक्षाखरीप हंगामातील पिके हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लाठी, सरांडी, वामनपल्ली, पोडसा, सोनापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली. खरीपातील लागवडीची खर्च निघेल की नाही, याचीच चिंता आहे. महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर शासनाने भरपाई जाहीर केली. परंतु, ती तुटपुंजी आहे. शिवाय, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी हतबललाठी परिसरातील बहुतांश गावे वन परिसराला लागून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला आदींसह कडधान्याची पिके घेतली जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. पंचनामे करून भरपाई देण्यास विलंब होतो. कागदपत्र गोळा करण्यातच शेतकऱ्यांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. नुकसानीच्या तुलनेत अल्प भरपाई मिळत असल्याने शेतकरी हैराण आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकºयांनी केली.पांदण रस्त्यांची समस्या यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत त्रासदायक ठरली. या हंगामातील पीक काढल्यानंतर बैलगाडीने घरी आणता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करीत आहे.-साईनाथ कोडापे, संचालककृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती