शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

पावसाअभावी फक्त ९.६८ टक्के पऱ्हे भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मृग नक्षत्रात जिल्ह्यात भाताचे पऱ्हे टाकण्याच्या दृष्टीने दमदार पाऊस न पडल्याने आतापर्यंत केवळ ९.६८ ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये चिंता : जिल्ह्यात कापूस ६२.२९ तर सोयाबीनची ४४.४५ टक्के पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्रात जिल्ह्यात भाताचे पऱ्हे टाकण्याच्या दृष्टीने दमदार पाऊस न पडल्याने आतापर्यंत केवळ ९.६८ हेक्टर क्षेत्रावर पºहे भरणी झाली आहे. कापूस उत्पादक तालुक्यात ६२.२९ टक्के लागवड झाली. मात्र, आद्रा नक्षत्रात पुरेसा पाऊस बरसला नाही तर रोवणी लांबणीवर जाण्यासोबतच ४०.१२ टक्के क्षेत्रात पेरणी झालेल्या तूर पिकालाही मोठा फटका बसू शकतो. धान, तूर, सोयाबीन,कापूस व ज्वारी या चार पिकांची प्रत्यक्ष पेरणी ३६.७६ टक्के असली तरी पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने १ लाख ७६ हजार ९३ हेक्टर क्षेत्रात भात, ५९ हजार ५६२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, १ लाख ८५ हजार २२८ क्षेत्रात कापूस, २९ हजार ६४० हेक्टर क्षेत्रात तूर आणि १ हजार १८७ हेक्टरमध्ये ज्वारी पिकाचे नियोजन करण्यात आले. गतवर्षी १ लाख ८५ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात कापूस, १ लाख ७६ हजार ९३ हेक्टरमध्ये भात, ४९ हजार ५६२ क्षेत्रात सोयाबीन आणि २९ हजार ६४० हेक्टर क्षेत्रामध्ये तूरीची लागवड करण्यात आली होती. मृग नक्षत्राच्या पहिल्याच टप्प्यात धान उत्पादक तालुक्यात दमदार एन्ट्री केली नाही. पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी व पोंभुर्णा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्याप पºहे टाकले नाही. ब्रह्मपुरी तालुक्यात मृग बरसल्याने आतापर्यंत ३८.९३ टक्के हेक्टर क्षेत्रात पºहे भरण्यात आले. उर्वरित सात तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.वरोरा तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन पेरणीगतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादक शेतकºयांसाठी पावसाची परिस्थिती बरी असल्याचे दिसून आले आहे. अकरा सोयाबीन उत्पादक तालुक्यांपैकी वरोरा तालुक्यात ९७.८४ हेक्टर सोयाबीन लागवड झाली. कोरपना ६१.९६, भद्रावती १७.७८, बल्लारपूर २३.९९, चिमूर १८.१८, पोंभुर्णा ७.३७, जिवती तालुक्यात २.७६ टक्के पेरणी झाली आहे.ब्रह्मपुरीत वाढले तुरीचे क्षेत्रब्रह्मपुरी तालुका धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तूर पिकाच्या नियोजित लागवड क्षेत्राहून अधिक क्षेत्रात लागवड झाली आहे. या तालुक्यात ८५९ हेक्टर क्षेत्राचे सर्वसाधारण नियोजन होते. मात्र, १ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात (१५३ टक्के) तूर लागवड झाली आहे.पिकनिहाय प्रत्यक्ष पेरणी (२३ जूनपर्यंत) ; धान-९.६८ टक्के, तूर-४०.१२ टक्के सोयाबीन ४४. ४५ टक्के, कापूस ६२.२९ टक्के, ज्वारी- ०.८५ टक्के.शेतकºयांचे डोळे आकाशाकडेमागील पाच वर्षांच्या कालावधीत सोयाबीन उत्पादकांची संख्या वाढताना दिसत आहे. खरीप हंगाम टळेल या धास्तीने बºयाच शेतकºयांनी कापूस लागवड केली नाही. १५ तालुक्यात आतापर्यंत ६२.२९ टक्के कापूस लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७९.९९ टक्के लागवड वरोरा तालुक्यात झाली आहे. कोरपना ७४.५९ टक्के, राजुरा ६३. ५७, गोंडपिपरी ५५.३३, पोंभुर्णा २४.८५, चंद्रपूर १९.४४, भद्रावती १७.५८, बल्लारपूर ५१.७४ तर सर्वात कमी लागवड मूल तालुक्यात ३.१४ टक्के लागवड झाली आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या असून हजारो शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसल आहेत.जिल्ह्यात १२.१९ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत १२.१९ टक्के पाऊस पडला. त्यामध्ये सर्वाधिक सावली तर सर्वाधिक कमी पाऊस जिवती तालुक्यात पडला आहे. चंद्रपूर तालुक्यात आतापर्यंत १४. ६ टक्के पाऊस पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती