शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:42 IST

नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना तालुक्याने सहकारी सूतगिरणी सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक किमान ९ हजार ६०० कापूस उत्पादनाची क्षमता ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे संपुष्टात आले आहेत. या धोरणानुसार सहकारी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरिता शासनाकडून भागभांडवल पुरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचार तालुके निकषात पात्र : ९ हजार ६०० टन कापूस उत्पादनाची क्षमता ओलांडली

्नराजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना तालुक्याने सहकारी सूतगिरणी सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक किमान ९ हजार ६०० कापूस उत्पादनाची क्षमता ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे संपुष्टात आले आहेत. या धोरणानुसार सहकारी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरिता शासनाकडून भागभांडवल पुरविण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील वाढत्या कापूस लागवड क्षेत्रावर नजर ठेवून या क्षेत्रात उतरण्यासाठी राजकीय फि ल्डींग लावणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता सहकार वर्तुळात वर्तविली जात आहे.पारंपरिक शेतीतून काहीच हाती येत नसल्याचे पाहून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कीडरोगांच्या प्रादुर्भावाची पर्वा न करता कापूस लागवडीकडे आकृष्ट झाले आहेत. गतवर्षी बोंडअळीने हल्ला केल्याने १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस उद्ध्वस्त झाला होता. सोयाबीन पिकालाही जोरदार फ टका बसल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच दुष्टचक्रात सापडली. मागील वर्षाच्या खरीप हंगामातील नुकसान लक्षात घेऊन कृषी विभागाने कपासीचा पेरा कमी व्हावा आणि शेतकऱ्यांनी अन्य पूरक पिकांचा पर्याय स्वीकारावा, याकरिता जागृती मोहीम राबविली होती. परंतु अन्य पिकांचा लागवड खर्च आणि हाती येणारे उत्पादन याचा तुलनात्मक विचार करून यंदाच्या खरीप हंगामात हजारो शेतकऱ्यांनी कापूस लागवडीलाच पसंती दिल्याचे दिसून येते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार २५५ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. यामध्ये वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना या चार तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. भात उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही यंदा तब्बल २२ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड केले आहे. बोंडअळी आणि विविध कीडरोगांमुळे उत्पादनाला मर्यादा आल्या आहेत. परंतु नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना तालुक्यांनी सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले ‘वार्षिक किमान ९ हजार ६०० टन उत्पादकता ’ हे बदललेले निकष पूर्ण केले. त्यामुळे सहकार, पणन व विभागाने या तालुक्यांना ‘कापूस उत्पादक तालुके’ म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यात सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी अद्याप कुणी धाडस केले नाही. पण राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचे भागभांडवल उपलब्ध होण्याची आडकाठी दूर झाल्याने राजकीय व सहकार क्षेत्रातीन नेत्यांना आयतीच संधी चालून आली आहे.नवीन वस्त्रोद्योग लाभदायक ठरणार२०१८ पूर्वीच्या वस्त्रोद्योग धोरणामध्ये काही जाचक अटींची तरतूद होती. या अटींमुळे जिनिंग व्यवसायाचा अपवाद वगळता सूतगिरणी उभारण्याचा प्रयत्न अनेकांनी सोडून दिला होता. नव्या धोरणात बदल करण्यात आले आहेत. किमान टन कापसाच्या उत्पादकतेतही उद्योगाभिमुख बदल झाले आहेत. सर्वसाधारणपणे २५ हजार २०० चात्या पूर्ण क्षमतेने सुरू असणाºया सहकारी सूतगिरणीला वर्षाला किमान २८ हजार ८०० गाठी (एक गाठ १७० किलो कापूस) आवश्यक असतो. २८ हजार ८०० गाठी कापूस म्हणजे सर्वसाधारणपणे चार हजार ८९६ टन इतका कापूस होतो. म्हणजे सुतगिरणीसाठी वार्षिक किमान चार हजार ८९६ टन इतक्या कापसाची गरज आहे. ज्या ठिकाणी नव्याने सूतगिरणी स्थापन होणार तिथे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी दुप्पट म्हणजे किमान नऊ हजार ६०० टन कापसाची उपलब्धता असणे वस्त्रोद्योग धोरणानुसार बंधनकारक आहे. नव्या निकषणानुसार वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना हे चार कापूस उत्पादक तालुके यशस्वी झाले आहेत. यामुळे राज्यातील पात्र १११ तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणाचे स्वागतच आहे. पण जिल्ह्यात केवळ राजकारणामुळे सहकारी सूतगिरणी उभी राहू शकली नाही. यापूर्वी सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी प्रयत्न केले होते. सहकारी तत्त्वाचा विसर पडल्याने आजच्या स्थितीत तरी सूतगिरणी उभी राहण्याची शक्यताच दिसत नाही.- मोरेश्वर टेंभुर्डे, माजी उपाध्यक्ष, विधानसभा